शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ९२१ युवकांना १७२ कोटींचे झाले कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 19:09 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून १२ कोटी व्याजाचा परतावा

सोलापूर : युवकांना स्वयंरोजगाराची दालने खुली करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने राबविलेल्या योजनांमध्ये २०१८ पासून दोन हजार ९२१ युवकांना लाभ मिळाला आहे, तर संबंधित बँकांनी १७२ कोटी ७१ लाख ४४ हजारांहून अधिकचे कर्ज मंजूर केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून अद्याप या व्याजाचा परतावा म्हणून १२ कोटी कोटी ९ लाख ८८ हजार रुपये देण्यात आले आहेत.

महामंडळाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर कार्यालयामार्फत केले जाते. बेरोजगार युवक, युवतींना आर्थिक मदतीचा हात देत, स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. कर्ज योजनेचा लाभ कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, तसेच लघू मध्यम उद्योगासाठी घेण्यात यावा, उत्पादन, व्यापार, विक्री, सेवा या क्षेत्रासाठीही या योजनेतून कर्ज उपलब्ध केले जाते.

कर्जासाठी येथे करा अर्ज

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना बेरोजगार उमेदवारांसाठी उपलब्ध असून, गरजू उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महामंडळाकडून व्याजाचा परतावा या योजनेंतर्गत अर्थसाहाय्य दिले जाते. बेरोजगार उमेदवारांनी www.udyog.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर LOI (Letter of Intent) जनरेट होतो. बॅंकेने संबंधित उमेदवाराच्या कर्ज प्रस्तावाला मान्यता दिल्यास महामंडळातर्फे व्याजाची रक्कम उमेदवारांच्या बचत खात्यात परत करण्यात येते.

कर्जासाठी कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांच्या आत असावे

'अण्णासाहेब पाटील महामंडळा'अंतर्गत नवउद्योजकांना विनातारण कर्ज देण्याचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून दिले जात आहे. या योजनेसाठी गटातील सर्व सदस्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या मर्यादेत असणे अपेक्षित आहे.

काय कागदपत्रे लागतात

आधार कार्ड, रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला, लाईट बिल, रेशनकार्ड, गॅस बिल किंवा बँक पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा), उत्पन्नाचा पुरावा (तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, आयटी रिटर्न, जर लग्न झाले असल्यास पती-पत्नीचे व लग्न झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य), जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे आवश्यक राहतील.

ज्या उमेदवाराचे प्रकरण बँकेत प्रलंबित आहे अशांनी व ज्यांना अजूनदेखील महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांनी महामंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयास भेटावे. बँकेत प्रकरण सादर करतेवेळी आपल्या प्रकरणासोबत विनंती अर्ज जोडावा व बँकेने प्रकरण नाकारले असल्यास तसे लेखी कारण बँकेकडून घ्यावे.

- योगेश वाघ, सोलापूर जिल्हा समन्वयक 

 

---

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणAnnasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ