शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची ४७१ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 5:14 PM

ऊस उत्पादक प्रतीक्षेत : कोल्हापूरच्या सर्वच कारखान्यांनी एफआरपी देऊन टाकली

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांकडे असलेल्या १०१४ कोटी रुपये थकबाकीत एकट्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे तब्बल ४७१ कोटी रुपयांचा समावेश आहे. दरवर्षी प्रमाणेच सोलापूरच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैशासाठी तिष्टत ठेवले आहे. सरत्या हंगामात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात विक्रमी ऊस गाळप झाले होते. कोल्हापूरच्या सर्वच कारखान्यांनी उसाचे संपूर्ण पैसे दिले आहेत.

मराठवाड्यातील काही मोजकेच साखर कारखाने सोडले तर राज्यातील साखर हंगाम मे महिन्यातच पूर्ण झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळपही मार्च-एप्रिल महिन्यात पूर्ण झाले आहे. मात्र, साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार नाहीत. राज्यातील ११० साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे १ हजार १४ कोटी रुपये दिले नाहीत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांकडे ४७१ कोटी रुपये थकले आहेत. कारखाने बंद होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र साखर कारखाने पैसे देण्याचे नाव घेत नाहीत. दरवर्षीच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने पुढील वर्षीचा गाळप हंगाम सुरु होण्याअगोदर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देतात. याही वर्षी तीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची आहे.

दहामध्ये तीन सोलापूरचे...

५९ व ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी देणाऱ्या राज्यातील १० साखर कारखान्यामध्ये ३ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. जय हिंद शुगर, इंद्रेश्वर शुगर व विठ्ठल रिफायनरी या तीन साखर कारखान्यांनी ७२ ते ७७ टक्के रक्कम दिली आहे.

* वैद्यनाथ परळी ४८ टक्के, राजगड भोर ५० टक्के, जय लक्ष्मी निवळी ५४ टक्के इतकीच एफआरपी दिली आहे.

* यामध्ये विठ्ठलराव शिंदे, श्री. पांडुरंग व इतर काही साखर कारखाने दरवर्षीच दिवाळीसाठी काही रक्कम राखून ठेवतात. याही वर्षी हे कारखाने दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगण्यात आले.

* सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, विठ्ठल कार्पोरेशन, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, बबनराव शिंदे, गोकुळ माउली या कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. गोकुळ धोत्री ६० लाख तर ओंकार चांदापुरीकडे अवघे ३३ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे.

राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ९६.८४ टक्के एफआर दिली आहे. ३.१६ टक्के राहिलेल्या ऊस उत्पादकांचे पैसे जुलै अखेरपर्यंत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी काही कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देतील. मात्र जे देणार नाहीत अशा कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात येईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने