शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार नुकसानभरपाई द्या; सोलापुरातील रिपाइंच्या मेळाव्यात ठराव

By appasaheb.patil | Updated: October 6, 2022 17:28 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात केला ठराव

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही अनेकांची पिके पाण्यातच आहेत. अशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपये देण्याचा ठराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात करण्यात आला. याचवेळी अन्य १० ते १२ ठरावही करण्यात आले.

या मेळाव्याचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय खजिनदार रामराव दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे होते. प्रारंभी प्रास्ताविक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी केले.

याप्रसंगी डाॅ. सारीपुत्र तिपुरे, डाॅ. राजकुमार सोनवले, संजय गाडे, चंद्रकांत कांबळे, जलील भाई, इ. जा. तांबोळी, प्रा. सुहास उघडे, फारूक शेख, रियाज सय्यद आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

यावेळी जक्कापा कांबळे, दत्ता सावंत, विनोद धाहिजे, रावसाहेब प्रक्षाळे, राजाभाऊ लोंढे, गौस पिरजादे, इजाज शेख, रफिक शेख, सलीम मुल्ला, अखिलेश माने, आबुबकर करजगीकर, इम्रान शेख, इब्राहिम शेख, समीर मुजावर, इरफान कलयाणी, महबूब पठाण, बोधी लालसरे, दयानंद वाघमारे, नसरीन शेख, अरुणा सरवदे, रेणुका सरवदे, प्रवीण म्हेत्रे, संदीप ससाणे यांच्यासह आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कांचन बनसोडे तर आभार सलीम शेख यांनी मानले.

-------------

मेळाव्यातील ठरावावर एक नजर..

  • - मुंबईतील दादर इंदू मिलच्या जागेवर होत असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकर पूर्ण करावे. रमाई आवास योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी.
  • - रेशन धान्य दुकानदारांमार्फत ग्राहकांना धान्य न देणाऱ्या या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी.
  • - मागासवर्गीय वित्तीय महामंडळामार्फत कर्ज योजनेचा लाभ हा त्या घटकांना मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी लीड बँकेला सक्ती करावी.
  • - संजय निराधार लाभार्थ्यांना दर महिन्याला रक्कम मिळावी
  • -जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणारे खोके त्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय हलवू नये

-----------

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूर