शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

७/१२ कोरा झाल्याने, बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना!

By संताजी शिंदे | Published: April 12, 2023 4:54 PM

मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती.

साेलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील जमिनींवर लावण्यात आलेले 'एमआयडीसी' हे नाव काढण्यात आले, त्यामुळे तब्बल २०५ दिवसाच्या आंदोलनानंतर बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना झाल्या. १४९ शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे झाल्यामुळे, आंदोलन मागे घेण्यात आले.

मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती. संपादनाची प्रक्रीया करण्यासाठी शासनाने सर्व जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर 'एमआयडीसी' असे नाव लावण्यात आले होते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करता येत नव्हती. आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, आमच्या ७/१२ वरील 'एमआयडीसी' हे नाव काढण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. २० सप्टेंबर २०२२ रोजी मंद्रुप येथील ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरूवात केली होती, मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती. 

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी १ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले, मात्र काही परिणाम झाला नाही. शेतकऱ्यांनी ९ मार्च रोजी मंद्रुप-मुंबई असा बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. अखेर १४ मार्च रोजी मंद्रुप-मुंबई बैलगाडी मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा विजापूर रोडवरील एजी पाटील कॉलेज जवळ मुक्कासाठी थांबला असता, त्यांना मुंबईला न जाण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मुंबईला जात आहे, तुमची मागणी मान्य होईल असे अश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी दक्षिण पंचायत समिती कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली होती.

 

टॅग्स :Solapurसोलापूर