शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

अहिल्यादेवी होळकरांचा लोककल्याणकारी इतिहास जगासमोर यावा - डॉ. उमेश कदम

By संताजी शिंदे | Updated: May 31, 2024 19:39 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर होते.

सोलापूर : मध्ययुगीन इतिहास काळात एक उच्च कोटीच्या प्रशासक राहिलेल्या रणरागिणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी महान कार्य करत आदर्श राज्यकारभार सांभाळला. त्यांची प्रसिद्ध युद्धनीती, आदर्श न्यायदान पद्धत, प्रजेबद्दल राहिलेली आस्था, मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार त्याचबरोबर त्यांनी केलेल्या महान कार्याचा इतिहास जगासमोर यावा, अशी अपेक्षा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील वरिष्ठ इतिहास प्राध्यापक डॉ. उमेश कदम यांनी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. कदम हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करत मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यावार्ता अंकाचे तसेच चिन्मयी मुळे लिखित क्वीन ऑफ इंडोमिटॅबल स्पिरिट या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याचबरोबर यावेळी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेली स्वाती राठोड, जागतिक पातळीवर कराटे स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेली भुवनेश्वरी जाधव आणि राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक स्पर्धेत यश संपादन केलेली तेजस्विनी केंद्रे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. बक्षिसाचे अभिवाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती माशाळे व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. काळवणे यांनी मानले.

टॅग्स :Solapurसोलापूर