शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

अहमदनगरची निर्यातक्षम साखर विदेशात; सोलापूर विभागातून पोहोचली मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 12:47 PM

मध्य रेल्वे - २१ वॅगनने भरलेली दीड हजार टन साखर मालवाहतुकीने मुंबईकडे रवाना

सोलापूर : अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये तयार झालेली निर्यातक्षम साखर मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात असलेल्या श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक (जि. अहमदनगर) येथून विदेशात पाठविण्यासाठी मुंबई येथील व्हिक्टोरिया डॉककडे पहिली मालवाहतूक गाडी रवाना झाली आहे. दरम्यान, २१ वॅगनमध्ये भरलेली १ हजार ३२९ टन साखर रेल्वेच्या मालवाहतूक गाडीने मुंबईत पोहोचल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कोरोना महामारीत लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रेल्वेच्या प्रवासी सेवेवर परिणाम झाला आहे. या काळात रेल्वेने मालवाहतूक गाड्यांवर जास्तीचा भर दिला आहे. नवनवीन गुड्स शेडमधून सध्या मालवाहतूक गाड्या मोठ्या प्रमाणात धावत आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या श्रीगोंदा रेल्वे स्थानक परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या गुड्स शेडमधून मंगळवारी २१ वॅगनने भरलेली मालवाहतूक रेल्वेगाडी रवाना झाली. यातून १ हजार ३२९ टन साखर मुंबईला पाठविण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये तयार झालेल्या साखर कमी वाहतूक खर्चात जास्तीचे अंतर कापून पोहोचत असल्याने शेतकरी, साखर कारखाना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दुसऱ्या मालगाडीसाठी साखर पोती तयार

पहिल्या मालवाहतूक गाडीतून यशस्वी वाहतूक झाल्यानंतर दुसरी मालवाहतूक गाडी गुरूवारी किंवा शुक्रवारी रवाना होणार आहे. २१ वॅगन भरेल एवढी साखर तयार असून, त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली आहे. मालवाहतुकीमुळे कमी वेळेत, कमी भाड्यात, जास्तीचे अंतर पार करून संबंधित कारखान्यांचा माल योग्य स्थळी पोहोचत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेSugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगर