शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

'कोणत्याही परिस्थितीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडूच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 13:35 IST

संपातील कर्मचाऱ्यांची विनामोबदला बाजू मांडणारे ॲड. सदावर्ते यांनी नांदेड येथील एक खासगी कार्यक्रम संपवून परत मुंबईला जाताना बार्शी येथे बस आगारातील संपात असलेल्या कामगारांची भेट घेतली.

ठळक मुद्देपुढे बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले, सध्या सरकार विविध मार्गांनी हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, एकी तोडू नका, असे म्हणत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर/बार्शी : राज्यातील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो लढा उभा केला, त्यात कोणत्याही संघटनेचा संबंध आहे. ही लढाई सीमेवरच्या सैनिकांप्रमाणेच आहे. सरकार वेळकाढूपणा करत असले तरी कोणत्याही परिस्थतीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असा विश्वास ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला.

संपातील कर्मचाऱ्यांची विनामोबदला बाजू मांडणारे ॲड. सदावर्ते यांनी नांदेड येथील एक खासगी कार्यक्रम संपवून परत मुंबईला जाताना बार्शी येथे बस आगारातील संपात असलेल्या कामगारांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रथम तेथील शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुहास भालेकर, नितीन गवळी, रामदास भाकरे, उमेश पवार, फिरोज मुलानी, कपिल लुकडे, हेमत साठे, संतोष गुंड, यांच्यासह भूम, तुळजापूर ,सोलापूर, कुर्डूवाडी या आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले, सध्या सरकार विविध मार्गांनी हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, एकी तोडू नका, असे म्हणत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या 45 दिवसांपासून संपावर आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी त्यांचा संप सुरू आहे. या संपाबाबत, आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

टॅग्स :ST Strikeएसटी संपSolapurसोलापूरBus DriverबसचालकCourtन्यायालय