शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

स्मशानभुमी नसल्यानं मागासवर्गीय मृत व्यक्तीचा रस्त्यावरच अंत्यविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 16:31 IST

२००६-२००७ मध्ये घोडेश्वर येथे गट नं १/१ मध्ये २० गुंठे जमीन मातंग व रामोशीला समाजाला देण्यात आली आहे.या जमिनीमधून नागपूर-रत्नागिरी हा महामार्ग गेला.

सोलापूर - मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे मागासवर्गीय स्मशानभूमी नसल्याने मृत व्यक्तीचे रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. घोडेश्वर येथील नागरिकांनी मागासवर्गीय स्मशानभूमीची मागणी खूपवेळा केली आहे. परंतु जागेचा फेरफार स्वातंत्र्य मिळत नसल्याने ह्या मागणीची पूर्तता केली जात नाही. थोडक्यात जागा असून खोळंबा नसून अडचण अशी परिस्थिती झाली आहे. 

२००६-२००७ मध्ये घोडेश्वर येथे गट नं १/१ मध्ये २० गुंठे जमीन मातंग व रामोशीला समाजाला देण्यात आली आहे.या जमिनीमधून नागपूर-रत्नागिरी हा महामार्ग गेला. पूर्वीपासून हा समाज या ठिकाणी मृतांचे अंत्यसंस्कार करत होते. स्थानिक नागरिकांकडून अनेकदा या ठिकाणी स्मशानभूमीची मागणी झाली आहे. आजतागायत दोन मृतदेहाचे अंत्यसंस्कार रस्त्यावरच केले आहेत. मागील आठवड्यात मातंग समाजाचे भाऊसाहेब अष्ठूळ (वय ४५) याचे निधन झाले. स्मशानभूमीची जागा निश्चित व स्मशानभूमी नसल्याने त्यांच्या मृतदेहावर रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत अंत्यविधी केला. अशा मोठ्या गावात मागासवर्गीय समाजाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

मातंग-रामोशी समाजाला २० गुंठे जागा

सन २००५-२००६ मध्ये मातंग-मुस्लिम समाजाला गट नं १/१ मधील ५० गुंठे जमीन दिल्याची नोंद आहे. पुढे २००६-२००७ यामधील मुस्लिम समाजाला स्वतंत्र ५० गुंठे जमीन देण्यात आली. याच साली मातंग-रामोशी समाजाला २० गुंठे जमीन दिल्याची नोंद आहे. मातंग आणि रामोशी समाजाला देण्यात आलेल्या स्वतंत्र २० गुंठ्याचा फेरफार मिळून येत नाही.परिणामी या दोन्ही समाजाची अवहेलना होत आहे.

७/१२ उतारा मिळतो,फेरफार नाही ?

सन २००६-२००७ मध्ये मातंग व रामोशी समाजाला २० गुंठे जमिनीची नोंद असल्याचा ७/१२ मिळतो,फेरफार का मिळत नाही, असा सवाल येथील मागासवर्गीय समाजाने केला. त्यावेळच्या स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याची बाब समोर येत आहे. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हा समाज स्मशानभूमीपासून वंचित आहे.

२०१०-२०१५ साली पत्र्याचे शेड मंजूर

सन २०१०-२०१५ या कालावधीत मातंग-रामोशी समाजाला स्मशानभूमीसाठी पत्र्याचे शेड मंजूर झाले होते. पत्र्याच्या शेडची मंजुरी असल्याने या ठिकाणी पाया खोदण्याचे काम चालू करण्यात आले होते.अचानक पाया खोदण्याचे काम थांबवण्यात आल्याची माहिती महादेव कसबे रा. घोडेश्वर ता.मोहोळ यांनी सांगितले.

घोडेश्वर येथील गट नं १/१ मध्ये एकूण १०.३७ हेक्टर जमीन आहे. यामधील विभागणी केलेल्या जमिनीचा प्रत्येक फेरफार आहे. परंतु मातंग व रामोशी समाजाला देण्यात आलेल्या ७/१२ चा फेरफार नंबर मिळत नाही. यामुळे मंडल अधिकारी, तलाठी यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे. फेरफार नोंद होऊन जागेचा पंचनामा झाल्यास स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करण्यात येईल.

-हरी पवार, ग्रामसेवक, घोडेश्वर

 

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूmohol-acमोहोळ