शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

अंतिम आदेश का काढले नाहीत उच्च न्यायालयाकडून शासनास विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:15 AM

यासंबंधी अकलूज येथे साखळी उपोषण चालू आहे. त्याचबरोबर अकलूज,माळेवाडी, नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली ...

यासंबंधी अकलूज येथे साखळी उपोषण चालू आहे. त्याचबरोबर अकलूज,माळेवाडी, नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याची गुरुवारी ८ जुलै रोजी सुनावणी झाली. याचिकेमध्ये अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायत व नातेपुते ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी व शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ए. आय. पटेल हे युक्तिवाद करीत आहेत.

अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यासाठी अकलूज-माळेवाडी व नातेपुते या तीनही गावच्या नागरिकांनी सन २०१८ पासून प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया सप्टेंबर २०१९ मध्ये अंतिम टप्प्यात असल्याचे शासनानेच लेखी स्वरूपात कबूल केले आहे. तरीदेखील ५० हजारांपेक्षा जास्त लोकांच्या महत्त्वाच्या नागरी हक्कांबाबतचा निर्णय घेण्यास शासन यंत्रणेची उदासीनता लक्षात घेऊन तिन्ही गावांच्या वतीने अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

----

नागरी हक्कापासून का वंचित ठेवले?

अकलूज व माळेवाडीतील ५० हजारांपेक्षा जास्त लोकांच्या महत्त्वाच्या अशा नागरी हक्कांबाबतचा ठोस निर्णय महाराष्ट्र शासनाने का घेतला नाही? त्यांच्या नागरी हक्कांपासून वंचित का ठेवण्यात आले? आज शासनाच्या संबंधित खात्यामार्फत या प्रश्नांना सांगण्यासारखी कोणतीही माहिती सरकारी वकिलांच्या कार्यालयात देण्यात आलेली नाही, असे सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले. सरकारी वकिलांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित खात्याकडून माहिती घेऊन उच्च न्यायालयास ७ दिवसांत उत्तर जाब देण्यास सांगितले आहे. आता सुनावणीची पुढील तारीख १७ जुलै निश्चित करण्यात आली आहे. अशाप्रकरे, उच्च न्यायालयात शासनाला जाब विचारला गेल्यामुळे, अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत निर्मिती दृष्टिपथात आली आहे.

----