शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या धोरणामुळे बळीराजाचा उडतोय गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:21 AM

माळशिरस : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या कृषी व्यवसायाला नैसर्गिक संकटांचा सामना काही नवीन नाही. सध्या शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीबाबत महावितरण, ...

माळशिरस : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या कृषी व्यवसायाला नैसर्गिक संकटांचा सामना काही नवीन नाही. सध्या शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीबाबत महावितरण, सत्ताधारी व विरोधी पक्ष, संघटना यांच्या बदलत्या धोरणामुळे नेमका कोणता निर्णय घ्यावा, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विजेचे बिल न भरल्यास वीजपुरवठ्याची देखभाल कशी करायची? तर सरकारही आपल्या निर्णयाबाबत धरसोड करत आहे. विरोधी पक्ष वीजतोडणीविरूद्ध आक्रमक आहे. यामुळे शेतकरी मात्र संभ्रमात आहेत.

महावितरणचा गाडा हाकण्यासाठी पैशांची गरज असल्याने बिलांच्या वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. सत्तेत नसताना वीजबिल भरू नका, म्हणणारे नेते सरकारमध्ये आल्यानंतर वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देत आहेत. मनसे, शेतकरी संघटनेसह काही संघटना वीजबिलाविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत तर विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नये, यासाठी आग्रही भूमिका मांडत आहे. त्यामुळे नेमके वीजबिल भरावे की नको, याबाबत शेतकरी संभ्रमात सापडला आहे.

वीजबिलाबाबत बळीराजा चिंतातूर

आपण वापरत असलेल्या विजेचे पैसे भरण्याबाबत शेतकऱ्यांचे दुमत नाही. मात्र, दुष्काळ, अतिवृष्टी, हवामानातील अनिश्चितता, कोरोना महामारी, बेभरवशी बाजारभाव व पिकांवरील वाढत्या रोगांमुळे शेतीचा खर्च व उत्पन्न याचे बिघडलेले गणित, सत्तेची पोळी भाजण्यासाठी विविध पक्षांनी दिलेली वीजबिल माफीची आश्वासनं यामुळे वीजबिलांचा डोंगर वाढत गेला. यामुळे वीजबिल भरणे सध्या शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शेतकरी सध्या वीजबिलाबाबत चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.

कोट ::::::::::::::::::::

सध्याची योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. या रकमेतून थेट निधी वापरला जातो. शिवाय शेतकऱ्यांना योग्य क्षमतेने व वेळेत वीज मिळण्यासाठी वीजबिलाचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व लाभ घ्यावा.

- ए. एल. वडार

कार्यकारी अभियंता, अकलूज

कोट ::::::::::::::::::

शेतकऱ्यांनी वीजबिल भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या योजनेत हप्त्याने बिल भरण्याची सुविधा असावी. सध्या कोरोना महामारी व इतर संकटांमुळे कृषी व्यवसाय संकटात असल्याने मुदतवाढ मिळावी, वीजपुरवठा कायम राहावा.

- उपेंद्र केसकर

अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत