शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

सोलापूरात एक लाख २३ हजार लाभार्थ्यांना दिला लाभ

By संताजी शिंदे | Updated: June 16, 2023 18:01 IST

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविण्यात येत आहे.

सोलापूर : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकानिहाय महाशिबिरातून, आजतागायत एक लाख २३ हजार २१२ लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात दि.१५ एप्रिल ते दि. ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहेत. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हाप्रमुख असून सोलापूर जिल्ह्यात अभियानादरम्यान १.५ लाख लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अभियान नियोजनाचा व अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा प्रशासनामार्फत दररोज आढावा घेण्यात येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने महसूल विभागांतर्गत फेरफार नोंदी निर्गती, विविध प्रकारचे दाखले वाटप, पी. एम. किसान योजना असे एकूण ६० हजार लाभार्थी, जिल्हा परिषदेमार्फत २० हजार, कृषि विभागामार्फत ८ हजार व नगरविकास, बांधकाम, आरोग्य, परिवहन व इतर विभागामार्फत ६५ हजार लाभार्थींना एकाच छताखाली लाभ देण्याकरीता महाशिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

नागरिकांना किचकट प्रक्रियेतून दिलासा

नागरिकांना विविध सामाजिक, आर्थिक आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची विविध कार्यालयात जाऊन जमवाजमव करणे, जमा केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयात जाणे अशा किचकट प्रक्रियेस सामोरे जावे लागते.

नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करून देणारी शासकीय कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने लोकांचा बराचसा वेळ व पैसा खर्च होतो. काही वेळा लोकांना शासकीय योजनांची माहिती नसल्याने योजनांचा लाभ गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. अभियानामुळे एकाच छताखाली नागरीकांना अल्प कालावधीत उपलब्ध होत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर