शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोठी बातमी; सोलापुरातील रिक्षाचा प्रवास आता झाला पाच रूपये महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 17:46 IST

बारा वर्षांनंतर भाडेवाढ : पहिल्या दीड किमी. साठी २३ रूपये

सोलापूर : आता ऑटो रिक्षाने प्रवास करण्यासाठी पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी अगोदर खिशात २३ रुपये ठेवा मगच बसा. कारण परिवहन रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर प्राधिकरणाने नुकतीच १८ रुपये पहिल्या दीड किलोमीटरसाठी दरवाढ जाहीर केली होती. ती मान्य न करता फेरप्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आणि त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरला १५ रुपये अशी दरवाढ सुचवली आहे.

गेल्या बारा वर्षांपासून महागाई वाढूनही रिक्षाचे प्रवासभाडे वाढले नसल्याने रिक्षाचालक कृती समितीचा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. आंदोलने, बंदही पुकारला होता. याची दखल घेऊन बैठक घेण्यात आली होती. त्यात रिक्षाचालकांची प्रतिकिलोमीटर ३० रुपयांची मागणी होती, मात्र प्रत्यक्षात बैठकीत पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी १८ रुपये दरवाढ सुचवली होती. ती मान्य न करता रिक्षा संघटनांनी याचा निषेध करीत आरटीओ प्रशासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. यात ही दरवाढ तुटपुंजी असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आरटीओ प्रशासनाने हा प्रस्ताव परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता.

यावर परिवहन प्राधिकरणाकडून साधकबाधक चर्चा होऊन तीन आसनी ऑटो रिक्षांसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपयांची दरवाढ सुचवली आहे. त्यानंतर पुढील किलोमीटरसाठी १५ रुपये आकारता येईल, असे म्हटले आहे. ही दरवाढ १८ जुलैपासून अंमलात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

----

काय झाला नव्याने निर्णय

रिक्षाच्या नव्या दरवाढीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीसाठी २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे. लगेजसाठी ५ रुपये आकारता येईल. ग्रामीण भागातील रिक्षांसाठी या कालावधीसाठी ४० टक्के भाडे अतिरक्त आकारता येणार आहे.

---

मीटर पुन:प्रमाणीकरण करा

- दरवाढ झाल्यापासून ९० दिवसांच्या आता मीटर पुन:प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. म्हणजे सध्या मीटरमध्ये नव्या दरवाढीचा समावेश संबंधित मेकॅनिककडून करून घ्यावा लागणार आहे. आणि त्याचे शासकीय तंत्रनिकेतन येथील संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. जे रिक्षाचालक याची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सुधारित दरवाढीचा अंमल करता येणार नाही.

---

आम्ही गेली अनेक दिवसांपासून केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र यापुढे हकमी समितीच्या शिफारशीनुसार भाड्याचे रिव्हिजन होऊन दरवाढ व्हावी एवढीच अपेक्षा आहे.

- सलीम मुल्ला, समन्वयक, रिक्षाचालक कृती समिती

---

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीस