शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जयसिद्धेश्वर महाराजांनी आयुष्यात पहिल्यांदाच केलं मतदान, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 14:45 IST

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी गावोगावी फिरताहेत.

मुंबई - भाजपकडून सोलापूरच्यालोकसभा रणांगणात उभारलेल्या गौडगावच्या जयसिद्धेश्वर महाराजांनी आयुष्यात प्रथमच मतदान केलं आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुका त्यांनी जवळून पाहिल्या. या निवडणुकांसाठी त्यांचे अनुयायी उमेदवार राहिले, निवडूणही आले, पण स्वामींनी कधीही त्यांना मतदान केलं नाही. मात्र, यंदा प्रथमच स्वत: उमेदवार असल्याने स्वामींनी मतदान केलं आहे.   सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी गावोगावी फिरताहेत. ज्या स्वामी महाराजांच्या चरणी दूरदुरुन लोक येत ते स्वामी महाराजा निवडणूक प्रचाराच्या काळाता गाव-खेड्यात जाताना दिसून आले. तर, जात-धर्म पंथ या पलिकडे जाऊन स्वामींनी मतदानसाठी मतदारांना आवाहन केलं. नेहमी भगवी वस्त्र परिधान करणाऱ्या जयसिद्धेश्वर महाराज यांचं स्वागत करण्यासाठी काळा बुरखा घातलेल्या काही भगिनी भाजपच्या मंडपात उभारल्याचंही चित्र यंदा पाहायला मिळालं. भगव्या वस्त्रातले महाराज गळ्यात हार घालून त्यांच्यासमोर विनम्रपणे उभे होते. तर दोघीजणी हातात पंचारतीचं ताट घेऊन त्यांना ओवाळत. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवारही साक्षीला उभे होते. 

जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. या महाराजांनी आजपर्यंत कधीच मतदान केलं नव्हतं. यंदा सर्वांना मतदानाचा हक्क बजावा, असे सांगणाऱ्या महाराजांनी कित्येक उन्हाळे-पावसाळे पाहिले. पण, यंदा प्रथमच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जय सिद्धेश्वर स्वामींचा शिष्यवर्ग मोठा आहे. त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. अक्कलकोट तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षात त्यांचे भक्त आणि अनुयायी आहेत. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर ते दिसत. बहुतांश कामाचे भूमिपूजनही त्यांच्याच हस्ते व्हायचे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकांच्या आखाड्यातही त्यांचे भक्तच उमेदवार असतात. त्यामुळे मतदान कोणाला करावे? असा प्रश्न स्वामींना पडत. जर आपण एका भक्ताला मतदान केलं, तर दुसरा भक्त नाराज होईल. कोणत्या एका नेत्याला मत दिलं तर ते त्या नेत्याला जरी माहित नसलं तरी परमेश्वर पाहणार. म्हणून महास्वामींनी कधीही मतदानाचा हक्क बजावला नाही. मात्र, यंदा ते स्वत:च उमेदवार असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पण, आज त्यांनी मौन व्रत बाळगल्यामुळे काहीही बोलण्यास नकार दिला.

कोण आहेत महाराजजयसिद्धेश्वर यांचा राजकारणाशी काडीमात्रही संबंध नसून ते अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख आहेत. आयुष्यभर अंगावर भगवी वस्त्रे नेसून या स्वामींनी संत साहित्य अन् धर्म प्रवचन हेच कार्य अंगिकारले होते. त्यांनी धर्मशास्त्रात पीएचडी केली असून कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यासह अनेक भाषा त्यांना अवगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2014 साली भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात होता; त्यावेळीही यांच्या नावाची कुजबूज सुरू झाली होती. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे जातीची वैध प्रमाणपत्रे सविस्तर नसल्याने त्यांचे नाव मागे पडले. अन् त्यांनीही त्यावेळी राजकारणात उतरण्याबाबतची ठाम भूमिका घेतली नव्हती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून जयसिद्धेश्वर यांचे नाव जोरात चर्चिले जात होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जयसिद्धेश्वर यांच्यासाठी जोर लावला होता. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशीही चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी जयसिद्धेश्वर यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरElectionनिवडणूकVotingमतदान