शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

सतर्क शेतकऱ्यांना मिळाली विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:20 AM

यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ झाली. मात्र जोमात आलेली खरीप पिके ...

यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ झाली. मात्र जोमात आलेली खरीप पिके सतत पाऊस पडत राहिल्याने नुकसानीत सापडली. त्यातच अतिवृष्टी झाल्याने पिके वाहून गेली. चांगला पाऊस पडल्याने यावर्षी दोन लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी एक लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविम्याची रक्कम भरली होती. शेतकरी हिस्सा १० कोटी ३५‍ लाख तसेच शासन हिस्स्यासह विमा कंपनीकडे १२० कोटी १५ लाख रुपये जमा झाले होते.

अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले असेल तर शासन व विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर, मेलद्वारे व लेखी अर्ज देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. त्यावेळी ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ४१ हजार ४२ शेतकऱ्यांना ३४ कोटी ७७ लाख रुपये विमा कंपनीने दिले आहेत. पात्र असलेल्या ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर आहेत, मात्र शासन हिस्सा जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पैशाची वाट पहावी लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे सजगपणे ( सर्तक) तक्रार नोंदविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे दिले मात्र विमा भरूनही अतिवृष्टीनंतर तक्रार नोंदविण्यासाठी गाफील राहिलेल्या सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर मदत अवलंबून आहे.

-----

२३८४ पीक कापणी प्रयोग

खरीप हंगामातील सर्वच पिकांचे २३८४ पीक कापणी प्रयोग करण्यात येत आहेत. त्यापैकी १९१६ प्रयोगाचे अहवाल शासन व विमा कंपनीकडे गेले आहेत तर ४६८ अहवाल अद्याप गेलेले नाहीत. हे अहवाल गेल्यानंतर व अहवालात नुकसान किती दाखविले यावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अवलंबून आहे, तूर व भुईमुगाचे पीक कापणी अहवाल पेंडिंग असल्याचे सांगण्यात आले.

---

दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा आमच्या तालुक्यातील शेतकरी भरतात. मात्र विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जाते. यावर्षी सर्वच पिके मातीसह वाहून गेली, मात्र सरकार व विमा कंपनीने अद्याप कसलीही आर्थिक मदत दिली नाही.

- बाळासाहेब पाटील,

माजी पंचायत समिती सदस्य

----