शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीत गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:24 AM

उत्तर सोलापूर तालुक्यात ४० गावे असली तरी ११ गावात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची आरोग्य खात्याची आकडेवारी सांगतेय. उर्वरित ...

उत्तर सोलापूर तालुक्यात ४० गावे असली तरी ११ गावात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची आरोग्य खात्याची आकडेवारी सांगतेय. उर्वरित २९ पैकी १७ गावांची आरोग्य खाते, आरोग्य सेविका व गावपातळीवरुन घेतलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे दिसत आहे.

आरोग्य खात्याकडील नोंदीनुसार या १७ गावात कोरोना सुरुवात झाल्यापासून

७९ व्यक्ती मयत झाल्या आहेत. तर गावपातळीवर सरपंच व गावकऱ्यांकडून घेतलेल्या आकडेवारीनुसार १४० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजे कोरोनामुळे दगावलेल्या ६१ व्यक्तींची नोंदच आरोग्य खात्याकडे नाही.

----

कौठाळीत आरोग्य खात्याकडे ४ तर आरोग्य सेविकेकडे १० मृत्यूची नोंद आहे. ग्रामस्थांच्या मते १७ मृत्यू झाले. मार्डीत १३ दगावल्याचे सांगतात मात्र ९ ची नोंद आहे.

- बीबीदारफळमधील आरोग्य खात्याकडे १६ ची नोंद असली तरी आरोग्य उपकेंद्रात ३१ ची नोंद आहे. रानमसलेची आरोग्य विभागाकडे ६ ची, आरोग्य सेविकेकडे १२ ची नोंद तर गावकऱ्यांच्या मते १५ व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्या.

- कळमणमध्ये ७ व्यक्तींचा मृत्यू झाला असला तरी दफ्तरी ३ ची नोंद आहे. भागाईवाडीत गावकरी व आरोग्य सेविकेकडे दोघांच्या मृत्यूची नोंद असली तरी आरोग्य खात्याकडे शून्य नोंदला आहे. अकोलेकाटी, पडसाळी, कारंबा, पाथरी व हगलुरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला प्रत्येकी एक तर गुळवंची व कोंडीत प्रत्येकी दोन

व्यक्ती कमी नोंदला आहे. कवठे येथे १४ व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्याचे गावकरी सांगतात मात्र आरोग्य विभागाकडे ५ इतकी नोंद आहे.

----

एकही मृत्यू झाला नाही

उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी, भागाईवाडी, शेरेवाडी, तेलगाव, समशापूर, राळेरास, नरोटेवाडी, होनसळ, सेवालालनगर, एकरुख, तरटगाव या गावात कोरोणाचा एकही बळी गेला नसल्याची आरोग्य खात्याची नोंद आहे.

---

लसीकरण व टेस्टिंगमध्ये अडकल्याने मृत्यूच्या नोंदीकडे लक्ष देता आले नाही. आढावा घेऊन व खात्री करुन आकडेवारी देतो.

- श्रीकांत कुलकर्णी

तालुका वैद्यकीय अधिकारी

----