शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काहीही झालं तरी नियमाचं अनलॉकिंग नकोच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:03 IST

‘काहीही झालं तरी मी नियम पाळत राहणार....’ अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची ही वेळ आहे. सध्याच्या ‘अनलॉकिंग’ परिस्थितीमध्ये आणखी जास्त काळजी घेणे अनिवार्य आहे.

मार्चचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे महिन्यातील असे एकूण जवळपास सत्तर दिवस आपण कोविड-१९ मुळे लॉकडाऊनमध्ये होतो. हा संपूर्ण प्रकारच अतिशय अनपेक्षित असा होता. आपण सारेजण गेल्या अनेक दशकांपासून आपल्याच ‘तालात’ जीवनाचं हे गाणं गात असतानाच टोळधाडीप्रमाणं कोरोना विषाणूंचा हल्ला चोहोबाजूंनी झाला आणि पुन्हा एकदा ही पृथ्वी फक्त माणूस नावाच्या प्राण्यासाठीच नाही हे सिद्ध झाले. 

मुळात हा विषाणू एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे राक्षसाप्रमाणे पसरतो. यासाठी काही नियम समोर आले आणि या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक बनून गेलं. ‘सरकारी नियम’ म्हणून आपण सारेजण हे नियम काटेकोरपणे पाळले. तरीसुद्धा ग्रीन ते आॅरेंज आणि तिथून लगेच ‘रेड झोन’ मध्ये आपण अवतरलो. दिवसागणिक ‘ब्रेकिंग’, ‘धक्कादायक’ अशा कोरोनाबाधितांच्या बातम्या निमूटपणे आपण ऐकत आणि वाचत राहिलो.... ही शृंखला आणखी सुरूच आहे. 

सगळं बंद राहून नक्कीच चालणार नाही. लहान-मोठे उद्योग, दुकाने हे जीवनचक्र सुरू ठेवावंच लागणार असल्यामुळे  जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यानुसार अंमलबजावणीचीही सुरुवात झाली. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे भोंगे वाजायला लागले. 

कामाला जायची लगबग आणि वेगवेगळ्या कारखान्यातून यंत्रांची धडधड सुरू झाली. मानवाच्या गतिमान जीवनमानाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. खरोखरच ही एक चांगली सुरुवात म्हणायला हवी. या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र नियमांचं पालन आवश्यकच आहे कारण अजूनही नियमांचं अनलॉकिंग झालेलं नाही. कोरोना विषाणूंचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आलेलं नाही. आणखी बरेच दिवस पाळायला अतिशय सोपे असलेले हे नियम आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहेत. आजूबाजूला सारं  काही सुरू होणं म्हणजे ‘आपण आता सुटलो, कोरोना नाहीसा झाला’ ...असं वाटत राहणं साहजिक आहे, परंतु हे खरं नाही. ‘काहीही झालं तरी मी नियम पाळत राहणार....’ अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची ही वेळ आहे. सध्याच्या ‘अनलॉकिंग’ परिस्थितीमध्ये आणखी जास्त काळजी घेणे अनिवार्य आहे, हे सुजाण नागरिकांना सांगण्याची गरज नाही परंतु आज काही ठिकाणी जे चित्र दिसते त्यावरून ‘जन प्रबोधनाची’ गरज असल्याचे लक्षात येते म्हणून हा लेखन प्रपंच ! 

रस्त्यावरून जाताना मास्क न वापरणे, बेफिकीरपणे कुठेही थुंकणे, कोणत्याही वस्तूला अकारण स्पर्श करणे, जमावाने फिरणे, गर्दी करणे या आणि अशा तत्सम गोष्टी बंद करणं आवश्यक आहे. बरं या गोष्टी दिसल्यानंतर ‘आॅन द स्पॉट’ सांगत राहणं तितकंच गरजेचं आहे.  या नियमांना ‘सरकारी नियम’ पेक्षा ‘माझे नियम’ समजून पाळले गेले तर नियमांची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे नक्कीच होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमांचं पालन हे १०० टक्के होणं अपेक्षित आहे कारण इथे चुकीला माफी नाही आणि नियम न पाळण्याच्या चुकीमुळे होणारे नुकसान खूप मोठे आहे. इतके दिवस सुरक्षित असलेल्या ग्रामीण भागातली परिस्थिती आता बदलते आहे. काही दिवसांसाठी शहरी भागाचा संपर्क कटाक्षाने टाळला जावा. ग्रामीण आणि शहरी भागातले दळणवळण आणखी काही दिवसांसाठी संपूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता प्रत्येकजण कोरोनाशी लढणारा एक ‘योद्धा’ आहे. नियमांचं पालन करणारी प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास आणि  पुरस्कार देण्यास पात्र आहे. याठिकाणी ‘स्वत:ची काळजी घेणे’ म्हणजेच ‘समाजाची आणि देशाची काळजी घेण्यासारखे’ आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचं पालन करणारी प्रत्येक व्यक्ती ‘वंदनीय’ आहे, हेच खरे ! स्वत:साठी, आपल्या कुटुंबीयांसाठी, आपल्या देशासाठी नियम पाळूया?...! धन्यवाद !- अरविंद म्हेत्रे(लेखक ‘निसर्ग माझा सखा’चे  समन्वयक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या