शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

वायुप्रदूषण संपवू या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:46 IST

जागतिक पर्यावरण दिन

पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व ओळखून १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने साºया जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा ५ जून १९७४ रोजी हा दिवस सबंध जगामध्ये साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत समाजामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आपण सारे जण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. 

 युनायटेड नेशन एन्व्हॉर्नमेंट या जागतिक संस्थेच्या वतीने दरवर्षी एका देशाला पर्यावरण दिनाचं यजमानपद आणि एक विशिष्ट घोषवाक्य दिलं जातं. मागच्या वर्षी २०१८ मध्ये या दिनाचं यजमानपद आपल्या भारत देशाकडे होतं आणि त्या वर्षाची अतिशय महत्त्वाची थीम होती ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’! अतिशय भयंकर अशा प्लास्टिक प्रदूषणाच्या समूळ उच्चाटनासाठी भारतासह साºया देशांनी त्या वर्षात काम केलं. वास्तविक पाहता प्लास्टिकच्या विषयावर आपण सातत्याने कृतिशील राहणे आवश्यक आहे. 

२०१९ या वर्षाच्या पर्यावरण दिनाचं यजमानपद चीनकडे असून वायुप्रदूषण हा मुख्य विषय आहे. प्रदूषित वायूमुळे दरवर्षी संपूर्ण जगामध्ये जवळपास ७० लाख जीव मरतात. यापैकी ४० लाख जीव आशिया खंडातील असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.  मानवाकडून केलं जाणारं कार्बन उत्सर्जन म्हणजे कार्बन फुटप्रिंट होय. उत्सर्जित किंवा बाहेर टाकलेल्या वायूमध्ये कार्बनडाय आॅक्साइडबरोबरच इतर घातक वायूंचा समावेश असतो. 

‘कार्बन फुटप्रिंट’चा सर्वात मोठा स्रोत म्हणजे आज मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मोटारगाड्यांचा वापर. याशिवाय प्रत्येकाच्या घरामध्ये वापरात असलेली विद्युत उपकरणे - ए.सी., फ्रीज आणि तत्सम वस्तू आणि मानवाची आधुनिक दैनंदिनी या गोष्टी तितक्याच कारणीभूत आहेत. 

कुठल्याही एका व्यक्तीच्या माध्यमातून पर्यावरणावर होणार विपरीत परिणाम मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘कार्बन फुटप्रिंट’ची संकल्पना मांडली.  लहान-मोठी झाडे, घराभोवती असलेली छोटी-छोटी रोपे कार्बनडाय आॅक्साईड शोषून घेऊन आपल्याला आॅक्सिजन देत राहतात. औद्योगिकीकरणानंतर हा वायू खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागला आणि त्याचबरोबर दुसºया बाजूला जंगले कमी होऊ लागली, झाडांची संख्या कमी होऊ लागली. या प्रकारामुळे वातावरण प्रदूषित व्हायला सुरुवात झाली. 

जगातील ९२ टक्के लोकांना श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळत नाही, हे एका सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. त्याचप्रमाणे हवेचे प्रदूषण माणसाच्या स्मरणशक्तीला बाधा आणते, त्यांना वैफल्यग्रस्त करते, असा शोध अमेरिकेच्या कोलंबस येथील ओहियो स्टेट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, माणसाच्या मेंदूतील जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो, असे तिथल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगात, तिथल्या संशोधकांनी मेंदूतील हिप्पोकॅम्पस या स्मरणशक्ती, शिकणे, भावावस्था यांच्याशी निगडित असलेल्या भागाचा सखोल अभ्यास करून सदर निष्कर्ष काढलेला आहे.

 वास्तविक पाहता या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक सजीवाला स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळणे हा त्या सजीवांचा मूलभूत हक्क आहे. आपल्या अवतीभोवतीची हवा प्रदूषित करणाºया प्रत्येक घटकाने एक क्षण थांबून विचार करण्याची ही वेळ आहे. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण सारे जण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि पुढच्या पिढीला स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळण्यासाठी आजच कृतिशील प्रयत्न करूया... !- अरविंद म्हेत्रे (लेखक हे पर्यावरण अभ्यासक  आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणInternational Forest Dayआंतरराष्ट्रीय वन दिनair pollutionवायू प्रदूषण