शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

गाळप हंगाम संपूनही कारखान्यांकडून ऊसबील मिळेना, बळीराजा करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

By विठ्ठल खेळगी | Updated: March 26, 2023 17:21 IST

शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

सोलापूर : कमलाई, मकाई, भैरवनाथ व हिरडगाव साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे गाळप उसाचे बिल आठ दिवसांमध्ये शेतक-यांच्या खात्यावर जमा न केल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांना चार ते पाच महिने झाले. कारखान्यास ऊस गाळपासाठी घालून कमलाई,मकाई,भैरवनाथ व हिरडगाव या कारखानदारांनी एक दमडी सुद्धा खात्यावर जमा केलेली नाही. एफआरपी कायद्यानुसार गाळप ऊसाचे १४ दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर ऊसाचे बिल जमा केले पाहिजे. मात्र शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

जर आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्तालय पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुपनवर यांनी दिला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव येडे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी बनकर, तालुका युवा अध्यक्ष कल्याण कोकरे, तालुका उपाध्यक्ष पद्माकर शिरसागर, नवनाथ कोळेकर, गणेश इवरे, धनंजय शिंदे, वैजनाथ तरंगे ,निलेश पडवळे ,प्रकाश काळे ,बाळासाहेब माने, तात्यासाहेब काळे, ॲड, नामदेव खताळ,उमेश सरडे आदी उपस्थित होते.