शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
3
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
4
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
5
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
6
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
7
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
8
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
9
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
10
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
11
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
12
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

शेतकऱ्यांनो सावधान; बियाणे, कीटकनाशक बोगस अन्  खतांमध्ये येतेय मीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 4:36 PM

कृषी विभागाचे लक्ष: बोगस बियाणे, कीटकनाशकची होतेय बाजारात विक्री

सोलापूर : शेतकऱ्यांनो पीक चांगले येण्यासाठी तुम्ही बियाणे, कीटकनाशक व रासायनिक खताचा वापर करीत असाल तर सावधान. या सर्व गोष्टी प्रमाणित असल्याची खातरजमा करा, अन्यथा बोगस उत्पादन माथी मारून विक्रेतेच मालामाल होत असल्याचे कृषी खात्याच्या कारवाईवरून दिसून आले आहे.

शेतीमध्ये विक्रमी पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आता शेतकरी बंधूमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी बाजारात मिळणारे बियाणे, रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन बोगस बियाणे, खते व कीटकनाशके बाजारात आणणारे एजंट सक्रिय झाल्याचे गेल्या वर्षभरात झालेल्या कारवायावरून दिसून आले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अनेक कंपन्या बंद होत्या. याचा फायदा घेत कोल्हापुरातील एजंटांनी तामिळनाडूतील बोगस खत बाजारात आणल्याचे उघडकीला आले होते. टेंभुर्णी व मोहोळ येथे झालेल्या कारवाईत ही बाब उघड झाली होती.

तसेच खरिपाच्या पेरणीवेळेस सोयाबीनच्या बियाणाला मागणी वाढली होती. या काळात बोगस बियाणांचा पुरवठा झाला. बार्शीत तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण झाली नसल्याची तक्रार आल्यावर कृषी विभागाने तपासणी करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. गहू, हरभरा बियाणाची खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

चार गुन्हे दाखल

गेल्या वर्षभरात अप्रमाणित खते व बियाणे विक्रीस आणणाऱ्या ४५ जणांना नोटिसा देण्यात आल्या तर ४ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. बियाणे अप्रमाणित पुरविणाऱ्या १३ कंपन्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत तर दोघांचा बियाणे परवाना निलंबित करण्यात आला आहे.

द्रवरूप खताबाबत सावधान

कृषी विभागाने खरीप व रब्बी हंगामावेळेस कृषी उत्पादन विक्रेते दुकानदारांची तपासणी मोहीम राबविली. यात सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या कीटकनाशकाला मागणी जास्त असते. विनापरवाना उत्पादित केलेले कीटकनाशक बाजारात येत आहे. त्याचबरोबर अलीकडे द्रवरूप खते बाजारात येत आहेत. असे ८० हजार किमतीचे १५० लिटर द्रवरूप खत कृषी विभागाने जप्त केले व संबंधितावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

या वर्षभरात करण्यात आलेली कारवाई

  • प्रकार             बियाणे             खते             कीटकनाशके
  • किती नमुने तपासले ७१२             ३९६             ३२५
  • अप्रमाणित नमुने १७             ४५             ८
  • नोटीस दिली             १७             ४५             ८
  • कोर्टात केसेस दाखल ३             २५             ७
  • विक्री बंदचे आदेश ०             ०             ०
  • जप्तीची संख्या-परवाने रद्द ०             १             ०

शेतकऱ्यांनी खते व बियाणे घेताना खातरजमा करावी. अलीकडे द्रवरूप खताचा वापर वाढला आहे. यासाठी मोठी किमत शेतकऱ्यांना मोजावी लागते. सेंद्रीय आहे, कंपनीचे आहे असे सांगून एजंट लोक बोगस माल पुरवितात. यात शेतकऱ्यांची फसवणूक होते. बाजारात येणाऱ्या अशा गोष्टींवर शेतकऱ्यांची करडी नजर आहे.

सागर बारवकर, गुण नियंत्रण अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी