शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उजनी अन् वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरीत पूर; व्यास नारायण झोपडपट्टीत शिरले पाणी

By appasaheb.patil | Updated: August 27, 2024 16:57 IST

चंद्रभागेच्या तीरावर असलेलया व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. 

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे, शिवाय उजनी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, उजनी अन् वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेच्या तीरावर असलेलया व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. 

उजनीतून भीमेत ८० हजार क्यूसेकचा विसर्ग तर वीरमधून नीरा नदीत ६३ हजाराचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाची पाणीपातळी सध्या १०७.७ टक्के एवढा आहे. सीना माढा, दहिगांव, मुख्य कॅनॉल, वीजनिर्मिती, नदीत पाणी सोडण्यात येत आहे. दोन ते तीन दिवसांपासून दौंडमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे पंढरपुरातील भीमा नदीला पूर आला असून पुरामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.

सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाकडून याेग्य ती काळजी घेण्यात येत आहे. बाधित परिसरातील नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.