शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

माळेवाडी-बोरगाव ग्रामपंचायतीसमोरच केला अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:26 AM

माळेवाडी-बोरगाव येथील मागासवर्गीय समाजातील माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी रात्री २ वाजता निधन झाले. ...

माळेवाडी-बोरगाव येथील मागासवर्गीय समाजातील माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी रात्री २ वाजता निधन झाले. सकाळी त्यांच्यावर माळेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील खासगी शेतकऱ्याने त्यांच्या शेतातून अंत्ययात्रा नेण्यासाठी विरोध केला. याला कारण की काही महिन्यांपूर्वी मयताच्या नातेवाइकांनी त्यांच्याविरुद्ध दोन केसेस केल्या होत्या. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने त्यांच्या शेतातून जाण्यासाठी त्यांना मनाई केली. यानंतर मागासवर्गीय समाजातील लोकांनी तहसीलदार व पोलिसांना कळवले. त्यानंतर माळशिरसचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. मयताचे नातेवाईक व शेतकऱ्याबरोबर चर्चा केली. मात्र यातून काहीही मार्ग निघाला नसल्याने मयताच्या नातेवाइकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी केला.

सार्वजनिक ठिकाणी माळेवाडी-बोरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रेताचे दहन करून, सार्वजनिक उपद्रव करून प्रेताची विटंबना केली. म्हणून सात जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे. यामध्ये दशरथ आनंता साठे, मिथुन सुरेश साठे, अनिकेत दशरथ साठे, अभिषेक दशरथ साठे, किरण सुरेश साठे, सुरेश आनंता साठे, अरुण आनंता साठे (सर्व रा. माळेवाडी-बोरगाव, ता. माळशिरस) यांचा समावेश आहे.

------

उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह १३ जणांवर ॲट्रॉसिटी

सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधीला अडवणूक केल्याबद्दल विमल सुरेश साठे (रा. माळेवाडी-बोरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंच रवींद्र शहाजीराव पाटील, सदस्य प्रवीण मधुकर कुदळे, चंद्रकांत मारुती पांढरे, पोलीस पाटील गजेंद्र भीमराव पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयरम रामचंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छींद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे, अमोल दत्तात्रय कुदळे अशा १३ जणांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

-----

सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तहसीलदारांना आम्ही बोरगाव स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याचे सुचविले होते. तरीसुद्धा गावाला वेठीस धरून ग्रामपंचायतीसमोर दहन करून मयताची त्यांनी विटंबना केली आहे. ही गोष्ट अशोभनीय आहे.

- रवींद्र पाटील, उपसरपंच, माळेवाडी-बोरगाव

----

शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी रात्री २ वाजता मयत झालेल्या व्यक्तीचे सायंकाळी ६.३० पर्यंत दहन झाले नव्हते. स्मशानभूमीत जाण्यास मज्जाव केल्यामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाइकांना जवळपास १४ ते १५ तास वाट पाहावी लागली. शेवटी तहसीलदारांनी पर्याय दिला. परंतु पावसामुळे चिखलामधून स्मशानभूमीकडे जाता येईना. दुसरा पर्याय निघत नसल्यामुळे आमच्या नातेवाईक व सामाजिक संघटनांनी याचा निषेध म्हणून ग्रामपंचायतीसमोर मयताचा अंत्यविधी केला. आम्हाला न्याय मिळावा.

- विमल सुरेश साठे, मयताचे नातेवाईक

----