शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

वीजबिल भरण्यास सवलत द्या अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:26 AM

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसह सांगोला महावितरण कार्यालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसह सांगोला महावितरण कार्यालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बाजारपेठा, रोजगार ठप्प झाल्याने जनता, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. वीजबिलाची आकारणी, मीटर रीडिंगमधील त्रुटी, चुकीची वीजबिले आल्याने वीजग्राहकांच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. मीटर रीडिंगऐवजी सरासरी वीजबिल दिले आहे. शेतीपंपाची वीजबिले भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.

यामुळे ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्यास सवलत द्यावी, वीजबिलाव्यतिरिक्त विलंब शुल्क आकारू नये, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी युवा नेते प्रताप घाडगे, शेतकरी संघटना अध्यक्ष बाळासाहेब वाळके, माजी सरपंच संजय घाडगे, माजी उपसरपंच बाळासाहेब घाडगे, सदाशिव माळी, लक्ष्मण वलेकर, यशवंत घाडगे, विजय शिंदे, महादेव पाटील, अजित घाडगे, पांडुरंग जानकर, गणपत बनसोडे, अनिल पवार आदी उपस्थित होते.

फोटो ओळ :

वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याच्या मागणीचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देताना चेतनसिंह केदार-सावंत यांच्यासह शेतकरी.