शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चांगली बातमी; शेजारच्या जिल्ह्यांपेक्षा सोलापुरातील कोरोना मृत्यूदराचा वेग खूप कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:36 IST

कोरोनाबाधितमध्ये पुणे अव्वल: उशिरा सुरुवात होऊन कोल्हापूरने टाकले मागे

ठळक मुद्देसोलापूर शहर आणि जिल्ह्यात २ सप्टेंबरपर्यंत १ लाख ६० हजार ४२१ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या कोरोनाच्या सुरुवातीला म्हणजे मे महिन्यात शहरात ८८, जूनमध्ये १६६ आणि जुलैमध्ये ११४ मृत्यू झाले होतेकोरोना टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटवर भर दिल्याने ही स्थिती दिसत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे

सोलापूर : कोरोनाचा मृत्यूदर वाढल्याने दोन महिन्यांपूर्वी देशात अव्वल ठरलेल्या सोलापूरचे नाव आता मागे पडले आहे. पुणे विभागात आता पुणे व  त्यानंतर कोल्हापूरला रुग्ण वाढले आहेत. 

जून आणि जुलै महिन्यात सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. कोरोनाने मृत्यू होण्याचेही प्रमाण अधिक होते. पण लॉकडाऊननंतर पुणे विभाग व मराठवाडा, विदर्भातील  जिल्ह्याने सोलापूरला मागे टाकल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात कोरोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात लवकर झाली. त्यामुळे मृत्यू वाढल्याने सोलापूरचे नाव देशपातळीवर गेले होते. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्यावर संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. 

कोरोना टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटवर भर दिल्याने ही स्थिती दिसत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. २ आॅगस्ट ते २ सप्टेंंबर या कालावधीत पुणे विभाग, मुंबई व मराठवाड्यातील शहरांची स्थिती पाहिली तर सोलापूर आता कोरोना संसर्गात मागे पडले आहे. पुणे, कोल्हापूर हे विभागात आघाडीवर आहेत. 

एका महिन्यात पुणे विभागातील रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. सोलापूर शहर: १ हजार ७०७ (मृत्यू: ५६), ग्रामीण: ८ हजार ४०३ (२३६),  पुणे शहर: ४४ हजार ५५५ (१२५), पुणे ग्रामीण: १७ हजार ८२६ (४३८), सातारा जिल्हा: ११ हजार ३५१ (२१९), कोल्हापूर शहर: ६ हजार १०१ (१५८), सांगली/मिरज: ६ हजार ९७७ (२२६), सांगली ग्रामीण: ५ हजार ६२४ (१६३), उस्मानाबाद जिल्हा: ५ हजार ३४९ (१२०), लातूर शहर: २ हजार ६६४ (७८), लातूर ग्रामीण: ३ हजार ६६५ (१०९) बीड: ४ हजार २०७ (१०५).

सोलापुरात चाचण्या वाढल्यासोलापूर शहर आणि जिल्ह्यात २ सप्टेंबरपर्यंत १ लाख ६० हजार ४२१ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १८ हजार ९७२ जण पॉझिटिव्ह आढळले होते. यातील १४ हजार २४२ जण उपचारानंतर  कोरोनामुक्त झाले आहेत. या कालावधीपर्यंत ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सुरुवातीला म्हणजे मे महिन्यात शहरात ८८, जूनमध्ये १६६ आणि जुलैमध्ये ११४ मृत्यू झाले होते. बळींचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त होत होती. त्यानंतर चाचण्या व उपचार पद्धतीत सुधारणा केल्यावर मृत्यूचे प्रमाण घटले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे