शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

संविधान आणि देश वाचविण्यासाठी "हात से हात जोडो" यात्रा सुरु केलीय - रमेश बागवे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 17:08 IST

रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी 'हात से हात जोडो' अभियानाच्या नियोजन विषयी महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती. 

सोलापूर : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापुर जिल्ह्याचे समन्वयक माजी मंत्री रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी 'हात से हात जोडो' अभियानाच्या नियोजन विषयी महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती. 

यावेळी बोलताना माजी मंत्री रमेश बागवे म्हणाले की, या देशात खोटे बोलून केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई, बेरोजगारी, जातीधर्मात तेढ आणि अराजकता वाढली आहे. सरकारी कंपन्या विकणे, उद्योगपतींचे कर्जे माफ करणे, मनुवादी विचार रुजविणे, स्वातंत्र्य, हिरावून घेणे, पत्रकारांवर माध्यमांवर दबाव, नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे छोटे उद्योग बंद पड़त आहेत. अशा प्रकारचे भाजपचे कारभार सुरु आहे. या विरुद्ध आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, संसदेत विरोधकांचे माईक बंद केले जात आहे. म्हणून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोड़ण्यासाठी, सत्य लोकांपुढे मांडण्यासाठी राहुल गांधींनी 'भारत जोडो यात्रा' सुरु केली आणि त्यांस देशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

आता भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे, या 'भारत जोडो' यात्रेचा संदेश, नऊ वर्षाचा मोदी सरकारचा अपयशी कारभार, त्यांच्यावरिल आरोपपत्र प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी, संविधान आणि देश वाचविण्यासाठी 'हात से हात जोडो अभियान' सुरु केले आहे.  त्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अतिशय चांगले नियोजन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली "हात से हात जोडो" यात्रा चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Solapurसोलापूर