शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस; गावागावात शिरले पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:32 IST

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढे, तलाव, नाल्यांना पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय अनेक गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव पुलावरून पाणी जोरात वाहू लागले आहे. बोरगांव-घोळसगांव चा संपर्क तुटला आहे.  अक्कलकोट तालुक्यातील किणीवाडी पालापुर पुल पाण्याखाली गेला आहे. कुरनूर धरणातून सद्यस्थितीमध्ये ६०० क्युसेकने प्रवाह सोडण्यात आलेला आहे.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. शिवाय सोलापुरात दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागात पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यात मोठा पाऊस पडला होता. तेव्हाही अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तहसिल प्रशासनाने नुकसानग्रस्त भाग व कुरनूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागणसूर येथे चार ओढे आहेत. मुसळधार पावसात नागणसूर येथील चारही ओढे फुल भरून वाहू लागले. चारही ओढ्यांवरील पुलावरून पाणी वाहत राहिले. यापैकी भासगी ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबली आणि नागणसूरचा संपर्क तुटला. सात तास गावचा संपर्क तुटला होता.नागणसूर पुलाकडेचा भराव वाहून

अक्कलकोट-नागणसूर राष्ट्रीय महामार्गावर भासगी ओढ्याच्या पुलावर दिवसभर पाणी राहिल्याने भराव वाहवून गेला. त्यामुळे या पुलावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडून दोन ठिकाणी रस्ता खचला आहे. येथे धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असून, याची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. पाणी ओसरताच लवकरात लवकर पुन्हा भराव टाकून रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिल्या. कर्नाटकमध्ये धावणारी वाहने ठप्प

मार्गावरून अक्कलकोटहून धावणारी बरीच वाहने ही कर्नाटक राज्यात जातात. तीर्थक्षेत्र हैद्रा येथे ख्वाजा दर्गा असून, येथे अमावास्या, पौर्णिमा आणि विविध सण, उत्सवादरम्यान भाविकांची दर्शनासाठी याच पुलावरील रस्त्यावरून वर्दळ असते. तोळनूर, अक्कलकोट स्टेशन, कर्नाटकातील माशाळ, करजगी, अफझलपूर, उडचण, मनूर, शिंदगी, विजापूर अशा अनेक गावांना हा रस्ता जोडतो. येथून वाहतूक ठप्प झाली आहे. हा रस्ता धोकादायक बनला असून, रात्रीच्या वेळी एखादा वाहनस्वार, पादचारी या खड्ड्यात पडून दुर्घटना घडू शकते.

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोट