शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

पावसाच्या भरोशावर धरली चाड्यावर मूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:15 AM

यावर्षी खरीप हंगाम चांगला होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. यासाठी मान्सूनपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली. सुरुवातीच्या नक्षत्रात पावसाने ...

यावर्षी खरीप हंगाम चांगला होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. यासाठी मान्सूनपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली. सुरुवातीच्या नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरिपाला चांगला पाऊस पडेल, अशी धारणा झाली होती. मात्र पेरणी हंगाम अर्ध्यावर पोहोचला तरी सर्वदूर पावसाची उणीव शेतकऱ्यांना भासू लागली. त्यामुळे काही ठिकाणी कमी अधिक पावसावर पेरणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. पाऊस न पडल्यास खरीप हंगाम वाया जाणार असून दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

चाड्यावर धरली मूठ

खरीप हंगामातील पेरणी रखडत चालल्याने शेतकऱ्याने अखेर चाड्यावर मूठ धरली असून तालुक्यात बाजरी ११८२ हेक्टर (२७.१ टक्के), मका ११२२ हेक्टर (१८.९१ टक्के), तूर १६.८० हेक्टर (१०.८४ टक्के), भुईमूग ३८ हेक्टर (७०.३७ टक्के), सोयाबीन १६.७ टक्के पेरणी झाली असून तृणधान्य २२ टक्के, कडधान्य ३९.९३ टक्के, गळीत धान्य ० टक्के अशी खरीप हंगामात २९ जूनपर्यंत २१.२० टक्के पेरणी करण्यात आलेली आहे.

फोटो :::::::::::::::::

भांबुर्डी (ता. माळशिरस) येथे पेरणी करताना शेतकरी बाळासाहेब वाघमोडे.