शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

माझी तर नोबॉलवरच विकेट गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:21 AM

मुळेगावतांडा (ता. द. सोलापूर) येथे बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे ...

मुळेगावतांडा (ता. द. सोलापूर) येथे बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगताना माजी मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मात्र कानावर हात ठेवले. छगन भुजबळ यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली. आपल्यावरील आरोपाबाबत काय, या प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, त्याबाबत फक्त मुख्यमंत्री बोलतील, असे त्यांनी वारंवार सांगितले.

भटक्या-विमुक्तांच्या पंचवीस मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून, मुख्य सचिवासोबत त्यावर चर्चा झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री बैठकीची वेळ देतील, असे त्यांनी सांगितले. १८७२ ला इंग्रज सरकारने बंजारा समाजासह काही जातींवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे. हा शिक्का पुसण्यासाठी भटक्या विमुक्त जातींना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप-सेना युती सरकारच्या काळात पोहरादेवी येथे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. या मेळाव्याला माजी महापौर अलका राठोड, राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, आयोजक संदीप राठोड, सिनेअभिनेता सी. के. पवार, प्रा. भोजराज पवार, शैलजा राठोड, पांडुरंग राठोड, दगडू राठोड, बाळू पवार, आदी उपस्थित होते.

........

नाईक महामंडळाला निधी नाही

अत्यंत दुरवस्थेत जगणाऱ्या बंजारासह अन्य जाती-जमातींच्या उद्धारासाठी सरकारने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली. काही काळ या महामंडळाने चांगले काम केले. मात्र, अलीकडच्या काळात सरकारने महामंडळाला निधीची तरतूदच केली नाही. भटक्या विमुक्तांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही, म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.