शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मैत्रीतून अशक्य गोष्ट साध्य...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 10:58 IST

मैत्रीचं  हे अनोखं नातं असतं...

मैत्रीचं  हे अनोखं नातं असतं... त्याची प्रचिती आपणास वेळोवेळी येते. काहीवेळा हे नातं रक्ताच्या नात्याइतकंच किंबहुना थोडं जास्तच दृढ असतं़ याचा अनुभव मला अनेक वेळा आला़ रक्ताची नाती ही आपणांस निवडता येत नाहीत, पण चांगले मित्र आपण निवडू शकतो. माझ्या शैक्षणिक वाटचालीत तसेच सामाजिक संस्थेमध्ये काम करताना चांगले मित्र मिळाले. असं म्हणतात, ‘संकटसमयी मदत करणाराच खरा मित्र’. मैत्रीच्या गोष्टीचा अनुभव मला अनेकवेळा आला़ पण पैकी दोनच अनुभव इथं मांडत आहे.

पहिला अनुभव : काही वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली़ यात मनुष्यहानी, निसर्गाचे नुकसान झाले़ ही बातमी टीव्हीवर पाहत असतानाच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला, तू नेहमी सांगत असतो की, मैत्रीचं जाळं दूरवर पसरलंय़ मला एका गोष्टीसाठी मदत करशील का? मी तिला विचारलं, काय मदत हवी आहे. तिने सांगितले की, तिच्या कंपनीत काम करणाºया एका अधिकाºयाचे आई-वडील उत्तराखंडातील या नैसर्गिक आपत्तीवेळी केदारनाथ या मंदिरात आहेत आणि त्यांचा ठावठिकाणा लागत नाही़ संपर्कही होत नाही. मनात विचार आला की, माझ्या संपर्कावर मित्रांचा किती विश्वास आहे़ मी प्रत्युत्तर दिलं, प्रयत्न करतो अन् विनंती केली त्या दोन्ही व्यक्तींची नावे, त्यांचा मोबाईल नंबर मेसेज कर. मी उत्तराखंडातील रोटरी गव्हर्नर मित्र कर्नल दिलीप पटनाईक याला फोन केला. त्याला मी सर्व परिस्थिती सांगितली़ त्याने मला सांगितले की, उत्तराखंडातील या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना योग्य स्थळी पाठवण्यासाठी विमानतळाचा प्रमुख अधिकारी म्हणून काम पाहत आहे. तो मेसेज वाचून मला त्या अधिकाºयाच्या आई-वडिलांचा ठावठिकाणा लागल्यास मला कळवेल. अगदी काही तासातच त्याचा फोन आला़ त्यांनी सांगितलं तू चौकशी करीत असलेल्या अधिकाºयाचे आई-वडील सुखरूप आहेत आणि त्यांना नजीकच्या विमानतळावर पाठवून दिले आहे. मला हे ऐकून आनंद तर झालाच, पण एक मित्र माझ्या मित्रांसाठी नैसर्गिक आपत्तीत अशक्य अशा मदतीला धावून येतोय, याचा अभिमान वाटला. लगेच मी मैत्रिणीला फोन करून ही गोड बातमी सांगितली.

दुसरा अनुभव : मी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करताना एक मित्र भेटायला आला. त्याच्या चेहºयावर प्रचंड ताण होता. मी त्याला काय झाले, असे विचारल्यानंतर आज मला तातडीची एक मदत हवी आहे, असे तो म्हणाला. बहीण, भाऊजी हे वैष्णोदेवी मंदिरास भेट देण्यासाठी गेले आहेत़ वैष्णोदेवी मंदिरास जाताना पर्वत चढताना भाऊजींच्या छातीत वेदना अन् कळा येण्यास सुरुवात झाली. त्यांना तातडीने जम्मू येथील एका हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले़ त्याची बहीण ही घाबरलेली असून, तिथे कोणीही परिचयाचे नाही. आम्हास चिंता लागली आहे, तेथील परिस्थिती अन् भाऊजींची प्रकृती कशी आहे? त्याने विनंती केली की, परिचयाचे कोणी मित्र तेथे असतील तर मदत मिळावी.

जम्मूतील उधमपूर येथे मी रोटरीच्या माध्यमातून ५ दिवस मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, माझी दोन व्यक्तींबरोबर मैत्री झालेली़ मी या दोन्ही व्यक्तींना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनीही त्यांचा मोबाईल नंबर मेसेज करण्यास सांगितले. अगदी २० मिनिटांनीच जम्मूतील मित्राचा फोन आला की, काही वेळातच तेथील विभागीय रोटरी सहा़ प्रांतपाल आणि रोटेरियन हे हॉस्पिटलमध्ये पोहोचतील. पाच मिनिटांत मला तेथील सहा़ प्रांतपाल यांचा फोन आला़ ते मित्राच्या भाऊजींजवळ उभे असून, रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टरसुद्धा रोटेरियन आहे आणि त्याच्याशी बोला, असे म्हणाले. मी त्या डॉक्टरांकडून सर्व माहिती विचारून घेतली. मित्राच्या भाऊजींना हलकासा हार्ट अटॅक आला असून, त्यांच्यावर योग्य उपचार चालू आहेत आणि पुढील उपचारासंदर्भात ते माझ्या संपर्कात राहतील. मी या गोष्टी मित्राला सांगण्यापूर्वी त्यांना बहिणीचा फोन येऊन गेला होता. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने धन्यवाद मानले. - डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरFriendship Dayफ्रेंडशिप डे