शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

सोलापूर जिल्ह्यात ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले; पाऊस चांगला पडला तर गाळपाची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 15:38 IST

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा ...

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा परिणाम ऊसवाढीवर नक्कीच होत असला तरीही सरत्या गाळप हंगामाप्रमाणेच उच्चांकी गाळप जिल्ह्यात होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत आहे. २००० नंतर एकापाठोपाठ एक असे साखर कारखाने उभारणी झाले. उजनी धरण तसेच गरजेनुसार विविध ठिकाणी झालेले मध्यम, साठवण व लघु तलाव, ओढे-नाल्याची खोदाई व त्यावरील बंधारे, याशिवाय जिल्हाभरात झालेल्या पाणी अडविण्याच्या कामामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळेच ऊसक्षेत्रात वरचेवर वाढ होत आहे. यामुळेच सरत्या हंगामात ३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालला व राज्यात उच्चांकी गाळपाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली.

पुढील वर्षाच्या गाळपासाठी बंद असलेल्यापैकी एक- दोन साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. यापुढेही पाऊस चांगला पडत राहिला तर उसाची वाढ जोरात होईल व टनेज वाढेल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

म्हणूनच ऊस लागवडीकडे कल

ढोबळी मिरची फेकून द्यावी लागली, द्राक्ष जागेवरच टाकावी लागली, टोमॅटो, कांदा शेतकऱ्यांना परवडला नाही. ज्वारी, गहू व इतर धान्याचे यापेक्षाही हाल सुरु आहे. मग शेतकऱ्यांनी करायचे तर कोणते पीक?, मागील काही वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव पाहता ऊसतोडणीसाठी थोडा त्रास होईल मात्र बिनबोभाट ऊस जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढलाय. त्यामुळेच जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढत असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.

चौकट

वर्ष ऊस क्षेत्र (हे.)

  • २०१७-१८ १,५३,५६८
  • २०१८-१९ १,०४,०८६
  • २०१९-२० १,२८,९७९
  • २०२०-२१ १,७१,००१
  • २०२१-२२ २,३०,०५०
  •  

( दोन वर्षांतील तालुकानिहाय ऊस क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • तालुका २०-२१ २१-२२
  • उत्तर सो. ४०.११ ५२.०३
  • दक्षिण सो. ११०.६८ ११८.६७
  • बार्शी १९.६८ ७३.२०
  • अक्कलकोट१८७.९८ २१५.१७
  • मोहोळ २७९.७४ २२५.९४
  • माढा १७९.४२ ३४९.४७
  • करमाळा १९५.८९ ३७३.८७
  • पंढरपूर ३२७.२१ ४६२.७८
  • सांगोला ३१.४४ ४७.०९
  • माळशिरस २३०.२० २५३.७९
  • मंगळवेढा १०७.६६ १२८.४०
  • एकूण १७१००० २३००००

 

जिल्ह्यात जलसंधारणची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने व मागील दोन वर्षे पाऊस चांगला पडल्याने जमिनीत पाणी जिरले आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्र ऊस वाढला आहे. यापुढे पाऊस चांगला पडला उसाची वाढ होईल व वजन वाढेल.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस