शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सोलापूर जिल्ह्यात ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले; पाऊस चांगला पडला तर गाळपाची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 3:38 PM

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा ...

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा परिणाम ऊसवाढीवर नक्कीच होत असला तरीही सरत्या गाळप हंगामाप्रमाणेच उच्चांकी गाळप जिल्ह्यात होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत आहे. २००० नंतर एकापाठोपाठ एक असे साखर कारखाने उभारणी झाले. उजनी धरण तसेच गरजेनुसार विविध ठिकाणी झालेले मध्यम, साठवण व लघु तलाव, ओढे-नाल्याची खोदाई व त्यावरील बंधारे, याशिवाय जिल्हाभरात झालेल्या पाणी अडविण्याच्या कामामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळेच ऊसक्षेत्रात वरचेवर वाढ होत आहे. यामुळेच सरत्या हंगामात ३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालला व राज्यात उच्चांकी गाळपाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली.

पुढील वर्षाच्या गाळपासाठी बंद असलेल्यापैकी एक- दोन साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. यापुढेही पाऊस चांगला पडत राहिला तर उसाची वाढ जोरात होईल व टनेज वाढेल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

म्हणूनच ऊस लागवडीकडे कल

ढोबळी मिरची फेकून द्यावी लागली, द्राक्ष जागेवरच टाकावी लागली, टोमॅटो, कांदा शेतकऱ्यांना परवडला नाही. ज्वारी, गहू व इतर धान्याचे यापेक्षाही हाल सुरु आहे. मग शेतकऱ्यांनी करायचे तर कोणते पीक?, मागील काही वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव पाहता ऊसतोडणीसाठी थोडा त्रास होईल मात्र बिनबोभाट ऊस जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढलाय. त्यामुळेच जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढत असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.

चौकट

वर्ष ऊस क्षेत्र (हे.)

  • २०१७-१८ १,५३,५६८
  • २०१८-१९ १,०४,०८६
  • २०१९-२० १,२८,९७९
  • २०२०-२१ १,७१,००१
  • २०२१-२२ २,३०,०५०
  •  

( दोन वर्षांतील तालुकानिहाय ऊस क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • तालुका २०-२१ २१-२२
  • उत्तर सो. ४०.११ ५२.०३
  • दक्षिण सो. ११०.६८ ११८.६७
  • बार्शी १९.६८ ७३.२०
  • अक्कलकोट१८७.९८ २१५.१७
  • मोहोळ २७९.७४ २२५.९४
  • माढा १७९.४२ ३४९.४७
  • करमाळा १९५.८९ ३७३.८७
  • पंढरपूर ३२७.२१ ४६२.७८
  • सांगोला ३१.४४ ४७.०९
  • माळशिरस २३०.२० २५३.७९
  • मंगळवेढा १०७.६६ १२८.४०
  • एकूण १७१००० २३००००

 

जिल्ह्यात जलसंधारणची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने व मागील दोन वर्षे पाऊस चांगला पडल्याने जमिनीत पाणी जिरले आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्र ऊस वाढला आहे. यापुढे पाऊस चांगला पडला उसाची वाढ होईल व वजन वाढेल.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस