शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौर प्रकल्प उभारणार; राज्य साखर आयुक्तांचे आवाहन

By appasaheb.patil | Updated: June 19, 2024 17:17 IST

सध्या दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. वरचेवर विजेचा वापर वाढत असताना पुरेशी व दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: तुम्हाला आवश्यक ती वीज मिळेल शिवाय उर्वरित वीज विक्रीतून पैसे मिळतील म्हणून तुम्ही उपलब्ध असलेल्या जमिनीवर, गोडाऊन व इमारतीवर सौर प्रकल्पांची उभारणी करावी असे आवाहन राज्याच्या साखर आयुक्तांनी केले आहे. येत्या काही वर्षात राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणी होणार असल्याचेही साखर आयुक्त कार्यालयाने सांगितले.

सध्या दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. वरचेवर विजेचा वापर वाढत असताना पुरेशी व दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. पर्याय म्हणून शासन सौर उर्जा प्रकल्पातून वीज तयार करण्यावर भर देत आहे. राज्यात जवळपास २३० साखर कारखाने आहेत. यातील पश्चिम महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखाने सोडले तर राज्यातील इतर साखर कारखान्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. या जमीनी उपयोगात आणण्यासाठी सौर ( सोलर) प्रकल्प राबविण्याचे आवाहन साखर आयुक्तांनी केले आहे.

साखर कारखाने व शेतकऱ्यांना शिल्लक जमिनीवर सोलर प्रकल्प उभारले तर होणाऱ्या फायद्याची माहिती कारखान्यांच्या अधिकार्यांच्या बैठकीत दिली आहे. एक मेगावॉटचा सोलर प्रकल्प उभारण्यासाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च येतो. साखर कारखान्यांनी स्वत: सोलर प्रकल्प उभारावेत अथवा आमच्याशी संपर्क केला तर ऊर्जा विभागाला आम्ही जोडून देण्यात येईल. ज्यांच्याकडे को-जन प्रकल्प नाही त्यांना वीज मिळेल व आहे त्यांना बंद काळात वीज मिळणार असल्याचेही साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेsolar eclipseसूर्यग्रहण