शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

जिल्हा बँक उतरविणार शेतकऱ्यांचा विमा, राजन पाटील यांची माहिती

By admin | Published: April 18, 2017 6:27 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८: आज स्पर्धेच्या युगात कोणाचेही जीवन सुरक्षित नाही, कुटुंबाचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी विमा गरजेचा असून, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये विम्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी केले.एक्साईड इन्शुरन्स कंपनी व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने बँक इन्स्पेक्टर व बँकेच्या कर्मचाऱ्यांना विमा उतरविण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद््घाटन बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एक्साईड इन्शुरन्स कंपनीने राज्यातील १३ जिल्हा बँकांशी करार केला असून, यामध्ये सोलापूर जिल्हा बँकेचा समावेश आहे. शेतकऱ्यांना विमा सेवा देण्यासाठी जिल्हा बँकेने एक्साईड इन्शुरन्स विमा कंपनीशी करार केला असून, बँक आता जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा विमा उतरविणार आहे. आज धावपळीच्या युगात प्रत्येकाचे जीवन धोक्यात आहे. आपण व्यवस्थित वाहन चालवित असलो तरी समोरचा येणारा सरळ जाईलच असे सांगता येत नाही. अशा परिस्थितीतही आपल्याला वेळेवर कामाच्या ठिकाणी जावे लागते. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकाने विमा उतरविला पाहिजे, असे बँकेचे अध्यक्ष पाटील म्हणाले. विमा कंपनीचे हेमंत कोठारी यांनी आमची विमा कंपनी २००१ पासून या क्षेत्रात काम करत असून, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यापासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेपर्यंत जबाबदारीने काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, सहायक व्यवस्थापक सुभाष भडगावकर, विमा कंपनीचे अमोघ देशपांडे, विकास जाधव, संदीप खोत आदी उपस्थित होते. -----------------खातेदारांसाठीही सुविधाखासगी बँकांच्या स्पर्धेत सोलापूर जिल्हा बँक मागे राहणार नाही, अद्ययावत सुविधा जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये देण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष पाटील म्हणाले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खातेदारांना चांगली सुविधा द्यावी, ठेंवी वाढविण्यावर भर द्यावाच शिवाय लोकांना आपली बँक आहे असे वाटेल असे काम करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.