शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

रामाकडे जावा किंवा काशीला तुम्ही लाेकांच्या मनातून उतरला; सदाभाऊ खोतांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2022 12:34 IST

सदाभाऊ खाेत : आदित्य ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्यावर टीका

सोलापूर : राज्यातील मंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बाेलायला हवे. पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि त्यांचे युवराज देशाच्या वारीवर जातात. रामाकडे जावा किंवा काशीला जावा, तुम्ही जनतेच्या मनातून उतरले आहात, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी येथे केली.

पंचायत समितीच्या समितीच्या दाैऱ्यानिमित्त खाेत सोलापूर शहरात आहेत. खाेत यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्यावर टीका केली. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. गोंधळ घातला. भाजपवर टीका करताना ज्यांनी राममंदिर बांधायची यांच्यात हिंमत नाही असे सांगितले. आता तेच लाेक अयाेध्येला निघाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या देहू दाैऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बाेलू दिले नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या हाेत्या. यावर खाेत म्हणाले, मला या लोकांचे हसू येते. काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा, बघू तुमची दानत आहे का? मला वाटते की, महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. सुप्रिया सुळेंनी तो शपथविधी आठवावा, मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही? प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगे काय? असा टाेला खाेत यांनी लगावला.

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे