शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

अरणगावच्या महिलेने साधली किमया; तीन एकरात घेतले २१ टन सेंद्रिय पेरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 10:53 IST

खारघर बाजारात अरणगावचे फळ; वनमाला गायकवाड शेतकरी महिलेची यशोगाथा

ठळक मुद्देबार्शी तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी वनमाला गायकवाड या महिलेने ही किमया साधलीअरणगाव शिवारातील बहुतांश भागातील माती ही वीटभट्टीला विकली गेल्याने या भागाची मुरमाड म्हणून ओळख कमी खर्चाची पिके व फळबागेची लागवड करून आपली शेती जास्त फायद्यात

बालाजी विधातेकारी : गावचा शिवार तसा मुरमाडच... कुसळ उगवायला देखील मुश्कील... अशा जमिनीत फळबागेची लागवड केली. तीन एकरावर पेरूची लागवड केली़ या लागवडीपूर्वी मशागत आणि त्याच्याबरोबर रासायनिक खत पूर्णत: टाळून गोमूत्र, काळा गूळ, शेण आणि बेसन पिठाच्या मिश्रणातून जीवामृत वापरले़ अभ्यासू वृत्तीने केलेल्या लागवडीतून दहा महिन्यांत २१ टन सेंद्रिय पेरूचे फळ घेतले आहे़ आज ही फळं मुंबईतील खारघर परिसरातील बाजारात सर्वाधिक दराने विकली जात आहेत.

बार्शी तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी वनमाला गायकवाड या महिलेने ही किमया साधली आहे़ दोन मुलं अभियंते आहेत़ परंतु त्यांचा शिक्षणाकडे ओढा असल्याने त्या स्वत: शेतीकडे लक्ष देतात. अरणगाव शिवारातील बहुतांश भागातील माती ही वीटभट्टीला विकली गेल्याने या भागाची मुरमाड म्हणून ओळख निर्माण झाली आहे़ वनमाला यांना वडिलोपार्जित २० एकर जमीन आहे. शेतामध्ये पेरूच्या एक हजार रोपांची लागवड केली. या जमिनीमध्ये त्यांनी पेरू हे मुख्य फळ आणि याच्याबरोबरीने आंबा व   जांभूळ, बांबू अशी इतर पिके त्या घेताहेत.

त्यांनी संपूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली आहे. ८ बाय ८ अंतराने पेरूची रोपं लावली आहेत. फळाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला नसून, कीटकनाशक म्हणून गोमूत्र फवारले आहे. खताचा पूरक डोस म्हणून जीवामृतचा वापर केला आहे. हे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने अंबविण्याची प्रक्रियाद्वारे वापरली आहे़ देशी गाईचे शेण, गोमूत्र, काळा गूळ आणि बेसन पीठ यांच्या मिश्रणातून हे तयार केले़ ही रोपं जगवण्यासाठी दीड एकर क्षेत्रात २़५ कोटी लिटरचे शेततळे उभारले आहे़ त्यात मत्स्यपालनही केले आहे. ठिबक सिंचनाचा आणि जीवामृतचा वापर केला आहे. याशिवाय आठवड्यातून दोन वेळा फवारण्या केल्या़ फळवाडीपोटी एकरी १५ हजार रुपये खर्च आला आहे.

कृषीभूषण पुरस्काराने गौरव - वनमाला गायकवाड यांच्या या प्रयोगशील शेतीची दखल घेऊन  बार्शी  कृषी पदवीधर संघटनेने घेऊन सन २०१९ चा ‘भगवंत कृषीभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कृषी सहायक बाळासाहेब चापले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून ही शेती विकसित करायला मदत केली आहे़ 

भविष्यात शेती फायदेशीर ठरणार आहे. परंतु शेतकºयाने प्रत्येक कामाचा हिशोब ठेवला पाहिजे. कमी खर्चाची पिके व फळबागेची लागवड करून आपली शेती जास्त फायद्यात कशी राहील, याचा विचार करणे गरजेचे आहे़ अभ्यासू वृत्तीने शेती केल्यास उत्पन्न वाढते, अपेक्षित निकाल हाती येतो.- वनमाला गायकवाड, पेरू उत्पादक महिला शेतकरी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळेorganic vegetablesसेंद्रिय भाज्या