शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

मुंबईचा बॉबी, मराठवड्यातला कुंदन अन् दक्षिणचा सारंग खरबूज भाव खातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:20 IST

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्याला दक्षिण सोलापूर तालुक्यातील बºयांच गावातून खरबुजाचा पुरवठा होतो.दरवर्षी एप्रिल आणि मे मेहिन्यात दिवसाकाठी जवळपास २० टनाहून अधिक फळाची आवक होतेमागीलवर्षाप्रमाणे यंदाही मुंबई आणि जिल्ह्यात अकलूज येथून बॉबी नावाचा पिवळा धमक खरबूजाची आवक

काशीनाथ वाघमारे

सोलापूर : उन्हाळ्यात शरिराला थंडावा देणाºया खरबुजाची जिल्ह्यात पाण्याअभावी अत्यल्प लागवड झाली आहे़ परिणामत: सोलापुरातील बाजार पेठेत मागील वर्षाच्या तुलनेत फळाची आवक घटली आहे. त्यामुळे भावही वधारला आहे. या काळात मुंबईतून आलेला बॉबी, मराठवडयातून येणारा कुंदन आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून फळबाजारात दाखल झालेल्या जवारी सारंग अशा विविध प्रकारच्या खरबुसांचा दर काहीअंशी वाढला आहे.

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते सर्व प्रकारच्या पिकांमध्ये ऊस आणि पाणीदार फळांना पाणी अधिक प्रमाणात लागते़ यामुळे सोलापूर जिल्ह्यात यंदा खरबुजाची लागवड कमी झाली आहे़ परिणामत: मुंबई आणि मराठवाड्यातून या फळाची आवक झाली आहे़ मराठवाड्यात तुळजापूर येथून यंदा प्रथमच कुंदन खरबूज दाखल झाला आहे़ हाच माल जिल्ह्यातून सांगोला, मंगळवेढा, बोरामणी, वळसंग, अक्कलकोट, धोत्री येथूनही आणला गेला आहे. मागीलवर्षाप्रमाणे यंदाही मुंबई आणि जिल्ह्यात अकलूज येथून बॉबी नावाचा पिवळा धमक खरबूजाची आवक झाली आहे. सध्या बाजारात बºयापैकी उपलब्ध असलेला जवारी सारंग खरबूज दक्षिण सोलापूरमधून माळकवठे, भंडारकवठे आणि मंद्रूप येथून दाखल झाला आहे.-----दररोज केवळ ४ टन  खरबुजाची आवक जिल्ह्याला दक्षिण सोलापूर तालुक्यातील बºयांच गावातून खरबुजाचा पुरवठा होतो. दरवर्षी एप्रिल आणि मे मेहिन्यात दिवसाकाठी जवळपास २० टनाहून अधिक फळाची आवक होते असते़ यंदा मात्र लागवडी अभावी केवळ ४ टनच मालाची आवक आहे़ जिल्ह्यात अजून १५ टन माल तुटवडा जाणवतोय. हिच स्थिती कायम राहिली तर आवक घटणार आहे आणि त्यांचे दरही वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तवली आहे़ ---लक्ष्मी मार्केटमधील शुक्रवारचे दर बॉबी खरबूज (१० ते ३० रुपये)कुंदन खरबूज (१० ते ६० रुपये)जवारी सारंग खरबूज (४० ते ६० रुपये)--------खरबूजसह अनेकप्रकारची फळं पाण्याअभावी जिल्ह्यात लागवड कमी झाली आहे़ त्यांची आवक घटली आहे़ सोलापूरचा व्यापारी आता मार्केट यार्डावर अवलंबून राहू शकत नाही़ काही व्यापारी पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद आणि कर्नाटकमधून फळं शोधून निर्यात करायचा विचार करतोय़ पाण्याचे संकट सर्वांपुढे असले तरी या काळात फळंही पुरवता आली पाहिजे़ अन्यथा व्यापारही चालणार नाही़ - फरिद शेखफळ विक्रेते 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारTemperatureतापमानfruitsफळेAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती