शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 10:41 IST

बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊत यांचा ६४७२ मतांनी पराभव केला.

Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) :  बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी निवडणूक निकालानंतर मुंबईत जाऊन माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी, 'काळजी करू नका राजाभाऊ, आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत", असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राजेंद्र राऊत यांचा सत्कार केला. बार्शीच्या निकालानंतर फडणवीस यांनी कॉल करून मुंबईत बोलावल्याचे राऊत यांनी सांगितले. 

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांनी बार्शी मतदारसंघात राजेंद्र राऊत यांचा ६४७२ मतांनी पराभव केला. त्यानंतरही फडणवीस यांनी राऊत यांना सोबत असल्याची ग्वाही दिली.

माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर आमच्यातील गटबाजींमुळे झाला : राऊत 

माझा पराभव विरोधकांकडून झालेला नाही. आमच्यातील एकमेकांचे पाय ओढणे याचा फटका बसला. आम्ही सुधारणा करू. केंदात मोदी सरकार आहे. राज्यात आमचे सरकार आलेले आहे. बार्शीतील सुरू असलेली विकास कामे अशीच सुरु राहतील, अशी भूमिका राजेंद्र राऊत यांनी मांडली, निवडणुकीतील पराभवानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

राऊत पुढे म्हणाले, "सर्वसामान्य जनतेने मला मतदान केले आहे. या निवडणुकीत कुणी काय केले हे मला माहीत आहे. माझ्याबद्दल जलसी असणायांना राजाभाऊ काय है दाखवून देतो. मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आता काम करताना माजी आमदार म्हणून मर्यादा असणार आहेत. ज्यांना निवडून दिले त्यांना विकास कामात सहकार्य करू," असा शब्द राऊत यांनी दिला. 

टॅग्स :barshi-acबार्शीShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस