शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

राष्टÑ सेवादलाचा उपक्रम : कीर्तन, प्रवचन, प्रबोधन गीतांचा समावेश

By admin | Published: May 11, 2014 12:20 AM

सामाजिक समतेची दिंडी

पंढरपूर : येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे, यासाठी साने गुरुजी यांनी केलेल्या उपोषणाची समाप्ती १० मे १९४७ रोजी झाली होती. त्यानिमित्त ‘दिंडी सामाजिक समतेची, लढाई जाती अंताची’ हा निर्धार परिपूर्ण होण्यासाठी महाराष्टÑातील सर्व सेवादल सैनिक टाळ-मृदुंगाच्या गजरात भगवी पताका खांद्यावर घेऊन वाजतगाजत मोठ्या संख्येने समता दिंडी राष्टÑीय सेवा दलाने पंढरपूरमध्ये काढली. समता दिंडीची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या वाड्यापासून (पुणे), महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, ओणी, साखरपा, कोल्हापूर, इचलकरंजी, अब्दुललाट, हेरवाड, कुरुंदवाड, जयसिंगपूर, सांगली, मिरज, सांगोलामार्गे पंढरपूरला आली. प्रत्येक ठिकाणच्या मुक्कामावर सांप्रदायाच्या परंपरेप्रमाणे कीर्तन, प्रबोधन गीतांचा कार्यक्रम झाला. पंढरपूरमध्ये समता दिंडी पोहचल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून विविध कार्यक्रमास सुरुवात झाली. यामध्ये प्रबोधन गीते, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम झाले. पंढरपूरमध्ये समता दिंडीची सुरुवात खरा तो एकचि धर्म या गातीवर मुलांनी नृत्य करुन केली. या दिंडीत सजीव देखावा, झांज पथक, लेझीम पथक त्याचबरोबर विविध ठिकाणी पथनाट्य व नृत्य सादर करण्यात आले. दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती़ ही दिंडी तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, शिवाजी चौक, नाथ चौक, तांबडा मारुती कालिकादेवी चौक, काळा मारुती चौक व चौफाळा चौक या मार्गावरुन काढण्यात आली. यावेळी राष्टÑीय सेवा दलाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, ह.भ.प. भद्रीनाथ तनपुरे महाराज, दत्तात्रय कोंडलकर, सुधीर खाडे, आबासाहेब नवले, विनोद बागल, अभिजित जानकर, सागर चंदनशिवे, प्रा. अरविंद कपोले, डॉ. अभिजित वैद्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

---------------------

ह.भ.प. भद्रीनाथ महाराज, राजाभाऊ अवसक व प्रा. दत्तात्रय कोंडलकर यांनी भगवा पताकाचा झेंडा उंच करताच ढोल-ताशांच्या गजरात झांज खेळत दिंडीला सुरुवात झाली.