शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

ना भत्ता, ना चहा-नाष्टा; उपाशीपोटी केले अंगणवाडी तार्इंनी निवडणुकीचे काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 2:43 PM

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने व्यक्त केला संताप

ठळक मुद्देनुकत्याच जिल्ह्यात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडलेशासकीय यंत्रणेच्या जोडीला शहर-जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाºयांनी उत्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कामे केलीया अंगणवाडीच्या तार्इंना भत्ता तर सोडाच, साधा नाष्टा अन् चहाचीही सोय केली नाही

सोलापूर : नुकत्याच जिल्ह्यात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. शासकीय यंत्रणेच्या जोडीला शहर-जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाºयांनी उत्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कामे केली. मात्र या अंगणवाडीच्या तार्इंना भत्ता तर सोडाच, साधा नाष्टा अन् चहाचीही सोय केली नाही. एकीकडे दोन महिने मानधन मिळाले नसताना त्यांनी केलेल्या सेवेची दखलही न घेतल्याबद्दल  महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेने संताप व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना निवडणूक प्रशिक्षणाचे काम देताना ते स्वीकारले नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा दम भरल्याने भीतीपोटी या कर्मचाºयांनी निवडणुकीसाठीच्या कामाचे प्रशिक्षण घेतले. मात्र सकाळी ६.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामे करणाºया अंगणवाडी कर्मचाºयांच्या चहा, नाष्ट्याचीही सोय करण्यात आली नाही, असा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड आणि जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार यांनी केला आहे. या कर्मचाºयांना अन्य कर्मचाºयांप्रमाणे भत्ता देण्यासही नकार दिला आहे. 

एकीकडे या कर्मचाºयांना मार्च, एप्रिल महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. यामुळे त्यांची आर्थिक अवहेलना होत असताना त्यांनी राष्टÑीय काम म्हणून प्रामाणिकपणे काम केले. या योजनेत काम करणाºया महिला विधवा, परित्यक्त्या, प्रौढ कुमारी, गरीब आहेत. त्यांच्यावर हा अन्याय का, असा सवाल कर्मचारी संघटनेने केला आहे.

दोन महिन्यांपासून मानधन नाही. तीन वर्षांपासून प्रवास भत्ता नाही. वास्तविक पाहता १३ डिसेंबर २००८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १० जून २०१० च्या महिला व बालकल्याण  मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संदर्भीय पत्रानुसार  अंगणवाडी कर्मचाºयांचे काम हे कुपोषित निर्मूलन करणे हे जबाबदारीचे काम असल्याने त्यांना निवडणुकीचे काम देऊ नये, असे असतानाही त्यांना हे काम दिले गेले. 

उच्च न्यायालयाचे निर्देश- अंगणवाडी कर्मचाºयांना निवडणुकीचे काम देऊ नये यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी २४ एप्रिल रोजी त्यांचा निकाल लागला. यात न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती कर्णिक यांनी या निकालाद्वारे निवडणुकीचे काम देऊ नयेत, फौजदारी गुन्हे दाखल करता काम नये, असे आदेश देण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. या निकालामुळे राज्यातील २ लाख  अंगणवाडी कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूरVotingमतदान