शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

केवळ साडेचव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांनाच मिळाला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:17 AM

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ...

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गेल्या वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना कळवली होती. त्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांनी दिलेली माहिती ग्राह्य धरली. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामासाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा २ लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी १ लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्राची प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती.

पीक विम्यापोटी शेतकरी हिस्सा १० कोटी ३४ लाख रुपये व सरकारचा हिस्सा ११० कोटी असा १२० कोटी ३४ लाख रुपये एवढा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरला होता. यातील केवळ ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळाली आहे. उर्वरित तब्बल २ लाख २५ हजार ८६२ शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. विमा कंपन्यांनी ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा लाभ जिल्ह्याला दिला असला तरी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

पीक विमा भरलेली तालुकानिहाय आकडेवारी

उत्तर सोलापूर १४५२, दक्षिण सोलापूर ८९७, बार्शी ३० हजार ८१६, अक्कलकोट १७१३, मोहोळ ६३७, माढा १८२, करमाळा २५७, पंढरपूर १२, सांगोला ३९, माळशिरस ९७, मंगळवेढा १९४१ अशा सोलापूर जिल्ह्यातील ३८ हजार ४३ शेतकऱ्यांना ३५ कोटी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर काढणी पश्चात नुकसान झालेल्या ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना ४ कोटी ४६ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.