शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोलापूर दक्षिणमध्ये घटला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 11:43 IST

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ; उमेदवारास फारशी चुरस नसल्याचे जाणवले !

ठळक मुद्देसोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद ३ लाख १० हजार २७२ पैकी एक लाख ६० हजार ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला८८ हजार ७८३ पुरुष तर ७२ हजार ११६ स्त्री मतदारांनी मतदान केले

नारायण चव्हाण

सोलापूर : विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अन्य मतदारसंघाच्या तुलनेत निचांकी मतदानाची नोंद झाली आहे़ पावसाचा फटका मतदानाला बसला असून, उमेदवारात फारशी चुरस नसल्यामुळे मतदान घटल्याची चर्चा आहे.

जिल्ह्याच्या अन्य मतदारसंघापेक्षा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद आहे. सरासरी ५१़८६ टक्के मतदान झाले आहे. ३ लाख १० हजार २७२ पैकी एक लाख ६० हजार ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८८ हजार ७८३ पुरुष तर ७२ हजार ११६ स्त्री मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांची संख्या स्त्रियांपेक्षा अधिक राहिली आहे. गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून येते.

निवडणुकीत फारशी चुरस नव्हती अशी सुरुवातीपासून मतदारसंघात चर्चा होत राहिली़ साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा निरुत्साह होता. मतदारांना घरातून मतदान केंद्रात आणण्यासाठी राजकीय पक्षांची यंत्रणा अभावानेच दिसली. 

भाजप-सेना -शिवसंग्राम-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबा मिस्त्री तथा मौलाली सय्यद, एमआयएमचे अमित अजनाळकर आणि वंचित आघाडीचे युवराज राठोड यांच्यात चौरंगी लढत असली तरी महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारातच खरी चुरस होती. आघाडीचे बाबा मिस्त्री मतदारसंघात नवखे असल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या़ त्यात काँग्रेसच्याच नेत्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करीत उमेदवाराला अपशकून केल्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. काँग्रेसमध्ये नाराजी तर राष्ट्रवादी गलितगात्र झाल्याचे प्रचारात स्पष्टपणे जाणवत होते. 

भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात भलतीच रंगतदार वळण घेत राहिली. एकाकी लढणाºया बाबा मिस्त्रींना काँग्रेसच्या श्रेष्ठींनी बळ दिले़ नाराज बाळासाहेब शेळके प्रचारात उतरले़ समर्थकही उघडपणे बाहेर पडले. ग्रामीण भागात बाबा मिस्त्री यांना वोट अन् नोट देऊन प्रचारात रंगत आणली. शेवटच्या टप्प्यात ही लढत ग्रामीण भागात चुरशीची झाली. लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळण्याची अपेक्षा भाजपकडून केली जात होती, मात्र अखेरच्या टप्प्यात असंतुष्ट कार्यकर्ते, पक्षांतर्गत गटबाजी या चर्चेने काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारल्याचे दिसून आले.

बाबा मिस्त्री शहरी चेहºयाचे, राजकीयदृष्ट्या फारसे परिचित नसल्याने भाजपच्या प्रचारात यांच्याविरोधात प्रभावी मुद्दे मांडता आले नाहीत़ सुभाष देशमुख यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर लक्ष केंद्रित केले़ याउलट मिस्त्रीसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुभाष देशमुखांना घेरण्याची एकही संधी सोडली नाही. लोकमंगलचा गैरव्यवहार, ऊसबिलाच्या रकमा मिळाल्या नाहीत, खोट्या विकासकामांचा डोलारा उभारला आदी मुद्दे प्रचारात घेऊन देशमुखांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जातीय समीकरणे मांडली गेली.सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक ग्रामीण भागात अत्यंत चुरशीची झाली़ गटातटाच्या राजकारणाचे पडसाद प्रचार सभातून उमटले़

नोकरदार, शेतकºयांनी फिरविली पाठ- पावसामुळे सकाळपासून मतदारांना घराबाहेर पडता येत नव्हते. ११ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती़ त्यानंतर उघडीप मिळाली आणि मतदार घराबाहेर पडले. शहरी मतदारांनी दुपारी मतदान केंद्रे गजबजून गेली तर ज्यांची नावे ग्रामीण भागाच्या मतदार यादीत समाविष्ट होती अशा शहरी मतदारांनी गावांकडे जाण्याचे टाळले़ त्याचा मतदानावर परिणाम झाला. विशेषत: नोकरदार, शेतकरी यांनीच पाठ फिरवली. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण