शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 12:52 IST

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत.आंबेडकरांच्या प्रचारासाठी मी पुढील ३० दिवस सोलापूर मुक्कामी - सुजात आंबेडकरकेवळ निवडणुका आल्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बहुजन समाजातील नेत्यांच्या घरी जातात - सुजात आंबेडकर

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसने अपप्रचार करणे बंद करावा. आंबेडकरांच्या प्रचारासाठी मी पुढील ३० दिवस सोलापूर मुक्कामी आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 सुजात आंबेडकर म्हणाले, सोलापुरातील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली होती. ही विनंती त्यांनी मान्य केली आहे. मागील खेपेला सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातून निवडणूक लढविली होती. एवढं चांगलं नेटवर्क असूनही शिंदे यांचा पराभव झाला. त्यांच्याविरोधातील नाराजी अद्यापही कायम आहे.

सोलापूरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो येथील पाण्याचा. येथील उद्योग, शिक्षण, गायरान जमिनींचे प्रश्न कायम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करतात ही सर्वात मोठी अफवा आहे. त्यांनी वंचित समाजाला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. बहुजन समाज आणि अल्पसंख्याक समाजाला एक हक्काचा मतदार बनवून ठेवले. केवळ निवडणुका आल्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बहुजन समाजातील नेत्यांच्या घरी जातात. लोक आता त्यांच्यावर चिडलेले आहेत. म्हणून तर २०१४ साली लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारले.

भाजपाप्रमाणे काँग्रेसही फेक न्यूज पसरविते  - प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत आले. याबद्दल विचारले असता सुजात आंबेडकर म्हणाले, काँग्रेसवाले या सर्व अफवा पसरवित आहेत. २०१९ च्या फेब्रुवारीपासून काँग्रेस एकाबाबतीत भाजपला फॉलो करीत आहेत ते म्हणजे फेक न्यूज. अबकी बार सोलापूर का खासदार, बाबासाहेब का वारसदार, हा नारा घेऊन आम्ही लोकांना भेटत आहोत. लक्ष्मण माने यांनी सातारा येथील सभेत जाहीर केले होते की प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा लढविणार आहेत. त्याला एक महिना झाला. पण अनेक लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. खरं तेव्हाच ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवी होती. अजून पुरावा आणि माहिती द्यायची गरज नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSharad Bansodeशरद बनसोडेBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवले