शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

पुन्हा खोळंबा; सोलापूर शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 12:14 PM

टाकळी येथील पंप गेली ६० तास बंद; गेली ६० तास टाकळी योजनेवरून पाणीपुरवठाच झाला नाही

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे महापालिकेचे टाकळी येथील पंप गेली ६० तास बंद राहिले. या कारणामुळे शहरात पुढील आठवडाभर पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने रविवारी रात्री कळविले.

सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात टाकळी ते सोरेगाव ही पाइपलाइन काही ठिकाणी नव्याने टाकण्यात येत आहे. नव्या पाइनलाइनच्या जोडणीच्या कामासाठी शुक्रवारी शटडाउन घेण्यात आले. हे काम रविवारी दुपारी १२ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर टाकळी येथील एक एक पंप सुरू करण्यात आला. सोरेगाव येथे पाणी पोहोचण्यास सायंकाळचे सहा वाजले. गेली ६० तास टाकळी योजनेवरून पाणीपुरवठाच झाला नाही. या कालावधीत शहराचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला. पुढील आठवडाहून अधिक दिवस शहरातील पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसाआड होईल. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

तीन स्रोत तुडुंब, तरीही पाण्याची बोंब

उजनी, औज बंधारा, हिप्परगा तलाव या शहराच्या तीन जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड होत असल्याचे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने एकाचवेळी मोठे शटडाउन घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कामे करणे अपेक्षित होते. परंतु, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे नियोजन चुकल्याने शहरावर संकट ओढवल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका