शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उसनवारी परत करत चला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:20 IST

देणाºयाची दानत कितीही मोठी असली तरी घेणाºयांनी उपकाराची जाणीव ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. देण्याची पद्धत कोणतीही असो. मदत म्हणून ...

देणाºयाची दानत कितीही मोठी असली तरी घेणाºयांनी उपकाराची जाणीव ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. देण्याची पद्धत कोणतीही असो. मदत म्हणून वा मुदत म्हणून, उसनवारी वा नापरतावा! पण, आपण घेतो याची जाणीव सदैव ठेवली पाहिजे. सव्याज व्यवहार काही स्तरापर्यंत ठिक आहे, परंतु देणाºयांनी माणूसपण जागृत ठेवून व्यवहार पूर्ण करणे आवश्यक असते. सव्याज व्यवहारातून होणाºया नकारात्मक घटना देणाºयाच्या मानसिकतेमुळेच होतात हेही विसरून चालणार नाही.

या बाबींची नोंद घेऊन देणाºयांनी घेणाºयांच्या घरावर नांगर फिरेपर्यंत मजल मारू नये म्हणजे घेणारा देण्यासाठी काही तरी तजवीज करून ठेवू शकेल, त्याच्या आयुष्याचे समीकरण त्याला व्यवस्थित हाताळता येईल. सर्वच व्यवहार प्रामाणिकपणे झाल्यास वाद-विवाद, भांडण-तंटे होणारच नाहीत. आयुष्य सुंदर आहे, परंतु योग्य समज असणे आवश्यक आहे. देणाºयापेक्षा परत करणाºयाची भावना शुद्ध असली की कोणत्याही प्रकारचा गैरसमज वा वाद होणार नाहीत, परंतु माणसामाणसांतील वाढत चाललेल्या दरीमुळे हे तुर्तास तरी शक्य नाही असे वाटते. तरीही आपण आशावाद जागृत ठेवायला काय हरकत आहे.

कधीकाळी केलेली आणि स्मरणात राहिलेली उसनवारी लक्षात ठेवून ती परत करण्याचा असाच एक सुखद प्रकार फेसबुकवर वाचला आणि माणसात अजूनतरी माणूसपण असल्याची खात्री पटली. ‘एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून देशात वादग्रस्त वातावरण निर्माण करणाºया ठकांची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी तीस वर्षांपूर्वी घेतलेल्या २०० रुपयांची उधारी फेडायला भारतात आणि तेही आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये येतो आणि काशिनाथ गवळी यांच्या घरी जाऊन पैशांची परतफेड तर करतोच शिवाय आपल्या देशामुळे, आपल्या महाराष्ट्रामुळे आणि काशिनाथ काकांसारख्या कुटुंबवत्सल माणसांमुळेच मी घडलो असे सांगून आपल्या देशाची चांगली प्रतिमा जगासमोर आणतो. ही किती अभिमानाने ऊर फुलून येणारी घटना वाटते.

परवा एका स्टेशनरी दुकानासमोर थांबलो होतो तेव्हा साधारण एक दहा वर्षांचा लहान मुलगा आपल्या वडिलांना वारंवार विनवत होता की, ‘बाबा द्या हो पैसे काकांना..’ मग आपसूकच माझं कुतूहल जागा झाल्याने मी त्यांच्या संभाषणाकडे लक्ष केंद्रित केले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्या मुलाने त्याच दुकानातून पेन्सिल, रबर, शार्पनर या वस्तू घेतल्या होत्या. परंतु त्याच्याकडे पैसे नसल्याने दुकानदाराला विनवणी करून ‘काका आज माझ्याकडे पैसे नाहीत मला पेन्सिल, रबर, शार्पनर उधार द्या ना! मी उद्या नक्की पैसे आणून देईन, या वस्तू नाही नेल्या तर टीचर रागावतील हो मला!’ दुकान शाळेजवळ असल्याने, शिवाय तो विनवणी करत असल्याने दुकानदाराला दया आली व त्याने वरील वस्तू दिल्या. आणि आज त्याचे वडील नेमकं त्याच दुकानातून काही वस्तू घेऊन बाहेर पडले परंतु मुलाची दहा रूपयांची उधारी काही परत करत नव्हते म्हणून तो मुलगा वारंवार वडिलांना बजावत होता की, ‘बाबा दुकानदार काकांचे दहा रुपये द्या हो..’ वडील म्हणाले, ‘अरे त्यांचं लक्ष नाही जाऊदे..’ पण त्या मुलाला हे काही पटतच नव्हतं.

माझ्याप्रमाणे दुकानदारही दोघांचे संवाद बारकाईने ऐकत होता. मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्या पालकाचा नाईलाज झाला आणि ते दोघेही मागे वळून दुकानात गेले. वडिलांकडून दहा रुपये घेऊन तो मुलगा दुकानदाराला परत करताना म्हणाला, ‘काका कालची माझी उधारी घ्या हं! पेन्सिल, रबर व शार्पनर घेतलं होतं तुमच्याकडून..’ दुकानदार पैसे घेत त्या मुलाला धन्यवाद म्हणायला विसरला नाही. मग तो त्या पालकाकडे वळला, पडलेला चेहरा पाहत म्हटला, ‘उसनवारी परत करत चला...म्हणजे देणाºयाला परत काही देताना गैरसमज होणार नाही.’ होकारार्थी मान डोलावत दोघेही मायबाप निघून गेले. दुकानदाराचे ते वाक्य खरंच खूप मार्मिक वाटले, ‘आपण घेतो, परंतु देताना त्याच भावनेने परत देतोच असं नाही.’ हे कुठंतरी थांबलं पाहिजे.- आनंद घोडके(लेखक जि.प. शाळेत शिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा