शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

धक्कादायक; खासगी जीपच्या गर्दीत धक्काबुक्की, परीक्षेसाठी मुली हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 3:36 PM

शाळेतील हजेरी घटली : विद्यार्थी जीव धोक्यात घालून करतात खासगी वाहनाने प्रवास

सोलापूर : मागील अनेक दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा दु:खवटा सुरू असल्यामुळे एस.टी.चे वेळापत्रक कोलमडलेले आहे. या काळात कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय ऑनलाइन असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा जास्त परिणाम दिसून आला नाही, पण सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पण, एस.टी. गाड्या बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे लवकर गाड्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

सोलापूर विभागातून सर्व आगारातून म्हणजेच नऊ आगारांतून गाड्या सुरू आहेत. पण, सध्या विभागातून जवळपास पाचशे फेऱ्या सुरू आहेत. ही संख्या पूर्वीच्या तुलनेत तीस टक्क्यांपर्यंतच आहे. ग्रामीण भागातील गाड्या सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची हजेरी कमी झाली आहे. तसेच सुरक्षिततेच्या कारणातून मुली व महिला या खासगी वाहनातून प्रवास करणे टाळत आहेत. यामुळे एस.टी. गाड्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार होत असूनही एस.टी. प्रशासन हतबल असल्याचे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून बऱ्याचपैकी गाड्या सुरू झालेल्या आहेत. यासाठी एस.टी.ला खासगी चालकांची मदत घ्यावी लागली. सध्या सोलापूर आगारातून दिवसाकाठी जवळपास दीडशे फेऱ्या होत आहेत. यामुळे एस.टी.चे उत्पन्न हे आठ ते नऊ लाखांपर्यंत पोहोचलेले आहेत.

बऱ्हाणपूर मार्गे अक्कलकोट एस.टी. कधी होणार सुरू

एस.टी.चे कर्मचारी कामावर हजर न झाल्याने ग्रामीण भागातील अनेक मार्गावर एस.टी. गाड्या धावलेल्या नाहीत. यात बऱ्हाणपूर मार्गे अक्कलकोटमधील किनीवाडी, तिर्हे मार्गे पंढरपूर, काडगाव मार्गे तुळजापूर, मोहोळमधील काही मार्गांवर अद्यापपर्यंत एस.टी. गाड्या सुरू नाहीत, यामुळे या मार्गावर गाड्या धावणार कधी असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला.

एस.टी.ला जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान...

सोलापूर विभागातील नऊ आगारांपैकी उत्पन्नाच्या तुलनेत सर्वांत मोठे आगार म्हणून सोलापूर आगाराकडे पाहिले जाते. या सर्व आगारांचे मिळून जवळपास पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न विभागाला मिळत होते. उत्पन्न आता जेमतेम दहा ते वीस लाखांमध्ये आले आहे. त्यामुळे दिवसाकाठी एस.टी.ला जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली

आजच्या निर्णयानंतर कर्मचारी वाढण्याची शक्यता

मागील अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे उत्पन्न बंद झाले आहे. यामुळे त्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. यामुळे अनेक कर्मचारी कामावर येण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. पण, दबावापोटी ते कामावर येत नाहीत. पण, मंगळवारी कोर्टाचे निर्णय पाहून जवळपास २० ते ३० टक्के कर्मचारी हजर होऊ शकतात, असा अंदाज एका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आम्ही एस.टी.ने प्रवास करताना आम्हाला सुरक्षित वाटते; पण खासगी गाड्यामधून प्रवास करताना प्रत्येक वेळी चांगले असतील याचा अंदाज आम्ही लावू शकत नाही. यामुळे ग्रामीण भागातून येताना आम्हाला नाइलाजाने खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

- स्नेहल माळगे, प्रवासी

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा