शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

धक्कादायक; पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘गायब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 7:30 PM

बोहल्यावर चढण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांनो लुटेरी दुल्हनपासून सावधान

मल्लिकार्जुन देशमुखे

सोलापूर : सध्या फसवणुकीचा नवा फंडा सुरू झालेला आहे. परराज्यातून मुली आणायच्या आणि लग्न जमवून द्यायचे. लग्नानंतर पैसे, दागिने घेऊन नवरीने धूम ठोकायची, असे प्रकार विविध जिल्ह्यात घडल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे सावधान, संपूर्ण चौकशी, माहिती गोळा करून पुढील पावले उचलून लग्न करा, अन्यथा पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘सावधान’ असा प्रकार होईल तरी अशा लुटेरी दुल्हनपासून सतर्क राहिल्यास फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.

मुलांची वये वाढू लागलीत.. मुलींची संख्या कमी झालीय..मुलांना विवाहासाठी मुली मिळेनात. याच समस्येचा फायदा दलाल, एजंट, काही बोगस विवाह संस्था घेऊ लागले आहेत. मुलगी दाखवून लाखो रुपयांची मागणी करायची. लाखो रुपये उकळले की मुलीने विवाह झाल्यावर पळून जायचे. मुलींचे आई-वडील, मुलींचे घर सर्व काही नकलीच. या नव्या फंड्याला असंख्य मुलं व त्यांचा परिवार बळी पडतोय. काहीजण पोलिसांकडे जातात तर काही जण समाजात इज्जत जाऊ नये म्हणून गप्प बसतात.

---------------

लग्नासाठी मुली मिळेनात...

आज अनेक समाजांमध्ये मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. मुलींचा जन्मदरदेखील मुलांच्या तुलनेत कमी असल्याने लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या. अनेकदा मुलींकडून शेतकरी नको नोकरीवाला तोही शहरात राहणारा हवा, यासह अनेक अपेक्षा असल्यानेदेखील मुली मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे अनेकजण वय वाढत असल्याच्या चिंतेत लग्नाची घाई करून अनोळखी मुलीशी लग्न करण्यास तयार होतात; मात्र अशा मुलांची नंतर फसवणूक होते.

------------

लग्नासाठी अनोळखीला पैसे देऊ नका...

लग्न जमविण्यासाठी अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका, अनेकदा पैसे घेऊन मध्यस्थी फरार होतात. आधी मुली मिळणे कठीण झाल्याने असे भामटे ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

------------

कोठून आणल्या जातात या मुली...

अशा मुली परराज्यातून आणल्या जातात. अशा मुलींकडून फसवणुकीचे धंदे अनेक ठिकाणी सुरू असतात. केवळ लग्नाचे नाटक करण्यासाठी त्या मुलींना निश्चित असा मेहनताना दिला जातो. काम झाले की त्या गायब होतात. पैसे दिले, लग्न झाले, त्याच दिवशी नवरी गायब असे नवनवीन फंडे वापरून फसवणूक केली जाते.

-----------

सर्व समाजात विवाहयोग्य मुलींची वानवा आहे. त्यामुळे अनेक जण, मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडतात. मुलगी गरीब घरची असली तरी चालेल; मात्र मुलाचे हात तर पिवळे होतील, अशा वर पित्याच्या काकुळतीचा गैरफायदा घेतला जातो. लग्न होताच नवरी दागदागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा करते. त्यामुळे अशा बतावणीला, भूलथापांना बळी पडू नका. जिल्ह्यातील विवाहयोग्य मुलांनी, पालकांनी याबाबत अधिक दक्ष राहून वधू मंडळीकडील सर्व बाबी नीट तपासून घ्याव्यात, तिची माहिती गोळा करून चौकशी करावी, योग्य वाटले तरच विवाह करावा.

- रणजितसिंह माने, पोलीस निरीक्षक, मंगळवेढा

 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी