शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

सिद्धेश्वर, हुतात्मा, उद्यान, कोणार्कसह मुंबई एक्स्प्रेसचे वेटिंग अडीचशेच्या पुढे

By appasaheb.patil | Updated: October 31, 2022 11:33 IST

प्रवासी गाड्या हाऊसफुल्ल; दिवाळीनंतर नोकरदारांचा परतीचा प्रवास

सोलापूर : आनंदाचा सण म्हणजे दिवाळी.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, सोलापूरहून पुणे, मुंबई, हैदराबादकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकिटाचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी ही २०० पेक्षाही जास्त झाली आहे.

दिवाळी असल्यामुळे बाहेरगावी असलेली अनेक कुटुंबे आपल्या गावी येतात. त्यामुळे त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले होते. २० ऑक्टोबरपासून रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी आता परतीच्या प्रवासाला लागले असून, आरक्षण तिकिटे काढण्यास स्थानकावरील खिडकीवर जाऊन चौकशी करताना त्यांना २०० पेक्षा अधिक वेटिंग असलेली तिकिटे मिळत आहेत.

----------

मुंबई-पुण्याला जाणाऱ्या सर्वच गाड्यांना सर्वाधिक गर्दी

सोलापूरहून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सर्वाधिक गर्दी आहे. सिद्धेश्वर, हुतात्मा, विशाखापट्टम, भुवनेश्वर, गदग, हैदराबाद, कर्नाटक आदी एक्स्प्रेस गाड्यांना हाऊसफुल्ल गर्दी आहे. मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्यांमध्येही दिवाळीच्या दिवसांमध्ये जागा उपलब्ध नाही. रेल्वेचे प्रवासी अन्य पर्यायी मार्गाने प्रवास करीत आहेत.

--------

ट्रॅव्हल्सलाही वाढली गर्दी...

रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने सोलापुरातील अनेक रेल्वे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवासाला पसंती देत आहेत. पुणे, मुंबईला जाणाऱ्या सर्वच कंपन्यांचे ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल आहेत. अन्य राज्यातून सोलापूरमार्गे जाणाऱ्या अनेक गाड्यांही सोलापुरात न थांबता थेट पुणे, मुंबईकडे जात आहेत. शिवाय अनेक प्रवासी खासगी बस, खासगी गाड्यांचाही आधार घेत आहेत.

-------

रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने रेल्वेचे प्रवासी आता खासगी गाड्यांमधून प्रवास करू लागले आहेत. अन्य सण, उत्सवकाळात विशेष गाड्या चालविणारे रेल्वे प्रशासन दिवाळीत विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय का घेत नाही? रेल्वेचे लाखाे प्रवाशांनी एसटी, खासगी ट्रॅव्हल्स व अन्य वाहनांनी प्रवास केला.

- राजाभाऊ जाधव, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर

---------

यंदा दिवाळीतील गर्दी लक्षात घेता सोलापूरच्या रेल्वे प्रशासनाने एकही विशेष रेल्वे गाडी चालविली नाही. आहे त्या गाड्यांमधून लोकांनी प्रवास केला. दरम्यान, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने लोकांनी अन्य वाहनांचा आधार घेत प्रवास केला. दिवाळीत विशेष गाड्या चालवायला हव्या होत्या.

- राजेंद्र कांबळे, रेल्वे प्रवासी

---------

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेDivaliदिवाळी