शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 10:21 IST

केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर टिका

ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी याच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळावा- मी विधान परिषदेत होतो तेव्हा शिंदे आणि देशमुखांना पाहून म्हणायचो की, एक हसमुख आणि दुसरे देशमुख. दोघांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला - गडकरी

सोलापूर : पंडित जवाहरलाल नेहरू ते राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी गरिबी हटावचा नारा दिला, पण काँग्रेसच्या काळात सर्वसामान्य माणसांची नव्हे तर कार्यकर्ते, नेते, चेलेचपाटे आणि चमच्यांची गरिबी हटली. त्याबद्दल काँग्रेसला दाद द्यावी लागेल, अशी टीका केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी पार्क स्टेडियमवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. 

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विकास महात्मे, महापौर शोभा बनशेट्टी, डॉ. जयसिद्धेश्वर, आमदार प्रशांत परिचारक, अविनाश महागावकर, शिवसेना नेते शिवाजी सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रा. अशोक निंबर्गी, नरसिंग मेंगजी, इंद्रजित पवार, श्रीमंत बंडगर, शिवशरण पाटील आदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या काळात गरिबी हटली नाही. पण काँग्रेसच्या काळात कोणाला मेडिकल कॉलेज, कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला डी.एड. कॉलेज मिळालं. या कॉलेजला प्रवेश देण्यासाठी त्यांनी पैसे वसूल केले. कोणाला प्राथमिक शाळा मिळाली. शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेस-राष्ट्रवादीची रोजगार हमी, अशी परिस्थिती राहिली. गडकरी म्हणाले की, मी विधान परिषदेत होतो तेव्हा शिंदे आणि देशमुखांना पाहून म्हणायचो की, एक हसमुख आणि दुसरे देशमुख. दोघांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला. काँग्रेसला ६० वर्षे देश चालविण्याची संधी मिळाली, पण त्यांनी देशाची बेइमानी आणि विश्वासघात केला. याच काँग्रेस पक्षाने ७० हजार कोटी रुपयांची विमानं खरेदी केली, पण विदर्भातील, सोलापुरातील शेतकºयांच्या पाण्याच्या योजना पूर्ण केल्या नाहीत. 

दोन्ही काँग्रेसची मुलं मांडीवर खेळायला लागली - सोलापूर जिल्ह्यातील टेंभू-म्हैसाळ योजनेचा उल्लेख करून गडकरी म्हणाले, काँग्रेस सरकारने १० टक्के ठेकेदारांकडून अ‍ॅडव्हान्स घेऊन सिंचनाची कंत्राटं दिली. १५ वर्षांनंतर टेंभू-म्हैसाळची योजना बंद पडली होती. लोखंडाच्या पाईपला गंज चढला होता. कंत्राटदार पळून गेले होते. पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचं. लग्न यांनी केलं. मुलं यांना झाली. हे पळून गेले आणि त्यांची मुलं देवेंद्रच्या मांडीवर बाबा बाबा म्हणून खेळायला लागली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांना रोजगार कसा मिळेल, अशी चिंता आहे. 

सोलापुरात हवेतून जाणारी बस येऊ शकते- गडकरी म्हणाले, नागपूरमध्ये हवेतून चाललेल्या बस आणल्या आहेत. रोप-वे, केबल कार यांसारख्या २८ कंपन्या यासाठी संयुक्तपणे काम करतात. या बसमध्ये २६० लोक बसू शकतात. सोलापूर महापालिकेने यासंदर्भात ठराव करावा. महापौरांनी यासंदर्भात आमदार, नगरसेवक यांना माहिती सांगावी. महापालिका निविदा न काढताही या कामाचा आराखडा तयार करू शकते. मेट्रोचे ट्रॅक टाकण्यासाठी प्रतिकिलोमीटर ३५० कोटी खर्च येतो तर हवाई बसच्या ट्रॅकसाठी प्रतिकिलोमीटर ५० कोटींपेक्षा कमी खर्च येतो, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरNitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस