शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

सोलापूरचा राष्ट्रभक्त तिरंग्याद्वारे देतोय एकजुटीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 10:13 IST

सद्भावना सेवा; संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात फिरून केली जाते जनजागृती

ठळक मुद्देदिव्यकांत चुनीलाल गांधी हे सध्या ७१ वर्षांचे असून, त्यांनी नागपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेदिव्यकांत गांधी यांचे ज्येष्ठ बंधू दिलीप गांधी हे अमेरिकेत स्थायिक आहेतसमाजामध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी दिव्यकांत गांधी यांनी तिरंगा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला.

संताजी शिंदे 

सोलापूर : स्वतंत्रता दिन..दीपावली, दशहरा, ईद, मोहरम, बैसाखी, ख्रिसमस, पर्युषण जैसे मनाओ,  राष्ट्रीय त्योहार जैसे मनाओ। असा संदेश देत चाळीस वर्षांपासून दिव्यकांत गांधी हे राष्ट्रभक्त तिरंग्याच्या माध्यमातून समाजाला एकजुटीचा संदेश देत आहेत. सोलापूर जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यात जाऊन स्वातंत्र्य दिनाबरोबर तिरंगा झेंड्याचे महत्त्व सांगतात. स्केटिंग खेळणाºया शाळकरी मुलांसमवेत गावागावात जाऊन स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जनजागृती केली जाते. 

दिव्यकांत चुनीलाल गांधी हे सध्या ७१ वर्षांचे असून, त्यांनी नागपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. दिव्यकांत गांधी यांचे ज्येष्ठ बंधू दिलीप गांधी हे अमेरिकेत स्थायिक आहेत. दिलीप गांधी व नातेवाईक जेव्हा भारतात येत असत तेव्हा ते अमेरिकेतील लोकांची देशभक्ती व भारतीयांची देशभक्ती यावर चर्चा करीत होते. दिव्यकांत गांधी यांना भारतीय लोक देशभक्तीवर जास्त बोलत नसल्याची खंत त्यांना वाटत होती. समाजामध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी दिव्यकांत गांधी यांनी तिरंगा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. आपला व्यवसाय सांभाळत त्यांनी १५ आॅगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. शहरातील शाळांना आवाहन करून विद्यार्थ्यांना गोळा करू लागले. विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा ध्वज देऊन विविध भागातून प्रभातफेरी काढली जाते. 

२६ जानेवारी २००० रोजी गुजरात राज्यातील कच्छ, सौराष्टÑ या ठिकाणी मोठा भूकंप झाला होता. वित्त व जीवितहानी झाली होती; मात्र हा दिवस काळा दिन म्हणून साजरा होऊ नये यासाठी दिव्यकांत गांधी हे घटनेनंतर चौथ्या दिवशी गुजरातमध्ये गेले. भूकंपग्रस्त लोकांना बॅग व कपड्याची मदत करीत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले होते. सुमारे १०० गावातून त्यांनी दौरा केला होता. सद्भावना सेवा दलाच्या माध्यमातून दिव्यकांत गांधी हे शासकीय रुग्णालयात गेल्या २८ वर्षांपासून धर्मशाळा व पाणपोई चालवतात. अवघ्या ५ रुपयात रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय करून दिली आहे. लोकांसाठी मदतकेंद्रही चालवत आहेत. 

खेल और संस्कार साथ साथ...बालपणापासूनच विद्यार्थ्यांना देशभक्तीची आवड निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून ते शालेय विद्यार्थ्यांसाठी, शुल्क न घेता ‘चेतक स्केटिंग’ चालवतात. विद्यार्थ्यांना स्केटिंग खेळाचे ज्ञान देत असताना ते मुलांना घरात आई-वडिलांसोबत कसे वागावे, समाजात कसे रहावे. शिस्त कशी पाळावी आणि आपली देशभक्ती जोपासावी याचे शिक्षण देतात. स्केटिंग खेळणाºया विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा झेंडा देऊन शहर तालुक्यातील बाजारपेठा, गावातील वेशी, वाड्यावस्त्यांवर विद्यार्थ्यांसमवेत १५ आॅगस्ट, २६ जानेवारी दिनानिमित्त जनजागृती केली जाते. विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतात. 

टॅग्स :SolapurसोलापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिवसEducationशिक्षणSchoolशाळा