शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोलापूरच्या वीज कर्मचाºयांचा कोकणात संघर्ष; भरपावसातही सेवा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:51 IST

चक्रीवादळ : दोन अभियंत्यांसह १२ जनमित्रांचा समावेश, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू

ठळक मुद्देकोकणात चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहेकोकणातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू सोलापुरातील बार्शी व सोलापूर शहरातील अभियंते, जनमित्र कोकणात सेवा देत आहेत

सोलापूर : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या वीज यंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे १४ अभियंते व कर्मचारी संततधार पावसात कोकणातील दापोली परिसरात (जि. रत्नागिरी) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या सोलापूर शहर व ग्रामीण तसेच बार्शी विभागातील दोन अभियंता व १२ जनमित्र दापोली तालुक्यातील हर्णे येथे वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. समुद्रकिनारी असलेल्या या गावातील सुमारे ९५ टक्के वीज यंत्रणा चक्रीवादळाने जमीनदोस्त झाली आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्ह्यातील मजूर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने वीज यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. यामध्ये नवीन वीज खांब रोवणे, वीज तारा ओढणे, खड्डे करण्यापासून वीज खांबांची खांद्यावरून वाहतूक करण्यापर्यंत सर्व कामे महावितरणचे कर्मचारी करीत आहेत.

या दुरुस्ती कामादरम्यान संततधार पाऊस हजेरी देत असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वीज यंत्रणेची कामे करावी लागत आहेत. मात्र चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न अभियंते व कर्मचाºयांकडून सुरु आहेत. या पथकांमध्ये सहायक अभियंता दाऊद तगारे (सोलापूर), कनिष्ठ अभियंता रमेश लोकरे (बार्शी) तसेच गोपाळ बार्शीकर, प्रमोद जगदाळे, पिराजी माने, आरिफ शेख, सचिन कानडे, बिलाल चाऊस, बजरंग अवताडे, शरणप्पा दड्डे, राजेंद्र बोधले (सर्व सोलापूर), श्रीपती आवटे, संदीप देठे, अमोल पाटील (सर्व बार्शी) यांचा समावेश आहे. 

गेल्या ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा कोकणच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. प्रामुख्याने रायगड व रत्नागिरीसह इतर काही जिल्ह्यांतील वीज यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७८०० वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर जिल्ह्यातून महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांचे पथके पाठविण्याचे निर्देश दिले होते.

कोकणात चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे़ कोकणातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सोलापुरातील बार्शी व सोलापूर शहरातील अभियंते, जनमित्र कोकणात सेवा देत आहेत. भर पावसातही विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम अहोरात्र सुरूच आहे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊसCyclone Amphanअम्फान चक्रीवादळ