शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

Solapur: यंदा फेब्रुवारीमध्येच संपले ऊस क्षेत्र; आतापर्यंत २५ कारखाने झाले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 2:11 PM

Solapur: राज्यातील इतर जिल्ह्यांचा साखर हंगाम वेगात सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप हंगाम सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी २५ पेक्षा अधिक कारखाने बंद झाले

- अरुण बारसकरसोलापूर : राज्यातील इतर जिल्ह्यांचा साखर हंगाम वेगात सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप हंगाम सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी २५ पेक्षा अधिक कारखाने बंद झाले, तर नऊ कारखाने चार-पाच दिवसांत बंद होतील, असे सांगण्यात आले.

राज्यात यंदा आतापर्यंतचा उच्चांक पार करीत २०४, तर सोलापूर जिल्ह्यात ३७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. सोलापूर जिल्ह्याने सोलापूरचाच विक्रम मोडीत काढला आहे. मागील वर्षी राज्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यात यावर्षी वाढ होत संख्या ३७ इतकी झाली आहे.

यंदा उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने गाळप हंगाम सुरू करताना अडचणी आल्या होत्या. काही जिल्ह्यांत १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू झाले, मात्र सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी पावसाच्या पाण्याचा अडथळा होता. त्यामुळे ऑक्टोबर अखेर व नोव्हेंबरचा पहिला आठवडा कारखाने सुरू होण्यास लागला. उशिरा कारखाने सुरू होऊनही सोलापूर जिल्ह्यात ऊस शिल्लक राहिला नसल्याने जानेवारी महिन्यात एक कारखाना बंद करावा लागला. २७ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २५ साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांतील कारखाने मात्र सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून दिसत आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच कारखान्यांचा पट्टा पडेल असे दिसते.

मागील वर्षी उसाचा एकरी उतारा सरासरी ४५ ते ४० टन इतका होता. यंदा वजनात मोठी घट झाली आहे. एकरी २० ते २२ टन इतकाच उतारा पडला आहे. उतारा कमी पडल्याने शेतकऱ्यांचे व गाळप हंगाम लवकर आटोपल्याने कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. किमान १५० दिवस पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू राहिले पाहिजेत.- महेश देशमुख, चेअरमन, लोकमंगल ॲग्रो बीबीदारफळ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSolapurसोलापूर