शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोलापूर विद्यापीठाला 'पब्लिक रिलेशन कौन्सिल'चा पुरस्कार

By appasaheb.patil | Updated: November 12, 2022 17:59 IST

राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर' हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाला पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर' हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. या संस्थेने कोलकाता येथे  11 नोव्हेंबर 2022 रोजी हॉटेल फेअरफिल्ड  मॅरिएट येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ .जी .एस .कांबळे आणि मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी स्वीकारला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे संस्थापक एम .बी . जयराम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही जनसंपर्क व जाहिरात क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. भारतातीत विविध राज्यात तसेच संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका इत्यादी देशातही या संस्थेच्या शाखा आहेत. या संस्थेतर्फे  चाणक्य ज्युरी पुरस्कारांसाठी देशभरातून विविध प्रस्ताव मागविण्यात आले होते .या संस्थेने नेमलेल्या तज्ञ समितीने आलेल्या प्रस्तावांची छाननी करून विविध निकषांच्या आधारे  निवड केली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाची 'कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी निवड करताना विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी  सुविधा,सुरू केलेले विविध अभ्यासक्रम,विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, विभागातर्फे मागील वर्षभरात आयोजित केलेले  शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन इत्यादी निकषांच्या आधारे या चाणक्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हा पुरस्कार स्वीकारताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की मास कम्युनिकेशन विभाग हा उपक्रमशील विभाग आहे. या विभागांमध्ये उभारण्यात आलेल्या टीव्ही आणि रेडिओ स्टुडिओच्या माध्यमातून विभागात  विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत .सर्व गोष्टींची दखल  पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाने घेऊन राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार देऊन विभागाचा गौरव केला याचा मला आनंद वाटतो. सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ .जी . एस .कांबळे म्हणाले की सामाजिक शास्त्रे संकुलातर्फे सातत्याने सांघिक स्तरावर चांगले कार्य जाते. या पुरस्कारामुळे संकुलाचा आणि विद्यापीठाचाही गौरव झाला आहे.

टॅग्स :Solapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरSolapurसोलापूर